राजन तेली: किती धडपड केली तरी त्यांचा पराभव हा निश्चित आहे…
⚡सावंतवाडी ता.१६-: गेल्या 15 वर्षात दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विकास करू शकले नाहीत. त्यामुळेच त्यांना आता आपल्या प्रचारासाठी मोठ मोठ्या नेत्यांना, मंत्र्यांना आणण्याची गरज भासत आहे. असा टोला राजन तेली यांनी आज दीपक केसरकर यांना लगावला आहे. परंतु, आता दीपक केसरकर यांनी कोणाच्याही माध्यमातून कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या कोणालाही आणून प्रचार केला तरी देखील त्यांचा पराभव निश्चित आहे. असे मत देखील व्यक्त केले आहे.
