मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थान जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात

मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत *💫सावंतवाडी दि.३१सहदेव राऊळ-:* मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचा १६ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. वेतोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २००४ सालापासून सुरूवात करण्यात आले होते. त्यापासून दरवर्षी मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. यंदाचे…

Read More

श्री. अनंत स्मृती ट्रस्टच्या कॉन्व्हेंट स्कूलचा भूमिपूजन समारंभ संपन्न

बी एस सी नर्सिंग झालेल्या मुलींनी यूपीएससी एमपीएससी परीक्षा देऊन बनावे अधिकारी – के. मंजू लक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्व समजले असून गरीब कुटुंबातील मुलीही उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. त्यात श्री अनंत स्मृती ट्रस्टच्या नर्सिंग कॉलेज अशा मुलींना चांगले शिक्षण देवून उत्कृष्ठ अशा नर्सेस तयार करीत आहे. त्यांचे हे…

Read More

कांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार

*💫मालवण दि.३१-:* कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेला तालुक्यातील कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार येत्या २ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत भरविला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा बाजार भरणार असल्याची माहिती कांदळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली आहे. कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील प्रत्येक शनिवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर…

Read More

नाशिक येथील जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ तृतीय

सिंधुदुर्ग संघाचे नेतृत्व केलेल्या राधिका घाटये हिचा ग्रामपंचायत तळवणेतर्फे सत्कार *💫सावंतवाडी दि.३१-:* नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने तृतीय क्रमांक मिळविला. राधिका नारायण घाटये हिने या संघाचे कर्णधारपद भूषविले. सिंधुदुर्गच्या या महिला संघाने मिळविलेल्या या यशामुळे सर्वत्र या टीमचे कौतुक होत असून राधिका घाटये हिचा ग्रामपंचायत तळवणेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

Read More

चिपी विमानतळाची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करा – खा. विनायक राऊत

*चिपी विमानतळ प्रकल्पाचा खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा वेंगुर्ले दि.३१-:* चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी सायंकाळी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला.एटीएस टॉवरची तसेच विमानतळाच्या यंत्रणेची पाहणी केली. आवश्यक सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत २० जानेवारी २०२१ रोजी चिपी…

Read More

अखेर त्या टॉवरचे काम सुरू

सावंतवाडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन प्रभू आजगावकर यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.३१-:* आजगाव येथील बी.एस. एन. एल टॉवर गेले अनेक दिवस बंद होता. हा टॉवर ३० डिसेंबरच्या आत सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन प्रभू आजगावकर यांनी बी.एस. एन एल च्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. अखेर…

Read More

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह ग्रामस्थांच्या भेटीला…

गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण;तरंगकाठीचे व पालखीचे ग्रामस्थांकडून विधीवत पूजन *💫सावंतवाडी दि.३१सहदेव राऊळ-:* मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण असून घरी आलेल्या तरंगकाठीचे व पालखीचे ग्रामस्थ पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत, भक्तिभावाने पूजन करीत आहेत. मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा…

Read More

जिल्ह्यात आज आठ जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 221;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 497 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 8 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

Read More

गावातील शुद्ध पाण्यावर असणार आता महिलांची नजर

फिल्ड टेस्ट किट द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रत्येक ग्रामपंचायतीतील पाच महिलांना देण्यात आले ऑनलाईन प्रशिक्षण गावातील शुध्द पाण्यावर आता गावातील महिलाची नजर असणार आहे. फिल्ड टेस्ट किट (FTK) व्दारे पाण्याची गुणवत्ता तपासण्याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील प्रती ग्रामपंचायत पाच महिलांना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिंधूदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन…

Read More

झुआरी जंक्शनचा अनोखा उपक्रम,बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

*💫दोडामार्ग दि.३१-:* मानवी जीवनासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्यातील एक महत्त्वपूर्ण गरज म्हणजे अन्न ही गरज मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरज म्हणून ओळखली जाते व ही पूर्ण करतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा, म्हणूनच शेतकरी राजाला पूर्ण जगाचा पोशिंदा मानला जातो. आपल्याकडील शेतकरी हा पूर्णता प्रगतशील शेतकरी नसल्याने व आपल्या शेतकऱ्यांना प्रगतशील शेती संदर्भात…

Read More
You cannot copy content of this page