विजेच्या धक्क्याने पियाळी येथे दोन गाईंचा मृत्यू तर शेतकरी किरकोळ जखमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसानभरपाई द्या: संतोष कानडे *⚡कणकवली ता.१३-:* विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे दोन गाई जागीच मृत्यू झाल्या असून शेतकऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना सकाळी कणकवली तालुक्यातील पियाळी येथे घडली. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेला प्रकार लक्षात घेता संबंधित शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी…

Read More

आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्याना महत्वाचे स्थान

*⚡मालवण ता.१३-:* निसर्गात लागवड न करता जंगलात, शेताच्या बांधावर,माळरानावर उगवणाऱ्या रानभाज्यामध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने तसेच औषधी गुणधर्म आढळून येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने या रानभाज्याना महत्वाचे स्थान आहे म्हणूनच आपल्या आहारात रानभाज्याचा वापर करा असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान…

Read More

आजगाव मोबाईल टॉवर सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित होणार

मळेवाड सरपंचांना दिले आश्वासन : पुकारलेले आंदोलन स्थगित *⚡सावंतवाडी ता.१३-:* आजगाव येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी पुकारलेले उपोषण बी एस एन एल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासन अंती स्थगित केले आहे. आजगाव शेटकरवाडी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता आहे. टॉवर उभारून जवळपास वर्ष उलटून गेले तरी तो कार्यान्वित करण्यात…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६हजार ५४५कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १,हजार ९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

डेगवे ग्रामस्थांचे रस्त्यासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतसमोर उपोषण

*⚡बांदा दि.१३-:* डेगवे होळीचा खुंट ते तांबोळी तिठा दरम्यानचा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक वेळा अपघात घडूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्ही डेगवे-मोयझरवाडी ग्रामस्थ 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता सावंतवाडी यांना दिले आहे. तसेच जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत…

Read More

त्रिंबक परिसरात बीएसएनएलचा टॉवर उभारावा मागणीसाठी मालवण व सावंतवाडी कार्यालयात धडक

त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली वाचला समस्यांचा पाढा *⚡मालवण ता.१३-:* मालवण तालुक्यातील त्रिंबक गावामध्ये बीएसएनएलच्या मोबाईलला रेंज मिळण्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याने ऑनलाईन सेवा सुविधेसह ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे या परिसरात बीएसएनएलचा टॉवर उभारावा या मागणीसाठी त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या मालवण आणि सावंतवाडी कार्यालयात धडक…

Read More

तळाशिल ग्रामस्थांच्या उपोषणास मनसेचा पाठिंबा :विनोद सांडव

तळाशिलच्या समुद्रकिनारी १५ ऑगस्टला ग्रामस्थ महिला भगिनीसह करणार उपोषण *⚡मालवण ता.१३-:* तोंडवळी तळाशिलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या अतिक्रमणांमुळे होणारी धूप तत्काळ थांबविण्यासाठी वेळोवेळी निवेदने शासन दरबारी पाठवूनही अद्याप त्याची दखल न घेतल्याने तळाशिलच्या समुद्रकिनारी १५ ऑगस्टला तळाशिल ग्रामस्थ महिला भगिनीसह सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहेत.या आंदोलनास मनसेचा पाठिंबा असल्याचे मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी…

Read More

दारु कंपनीकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल न घेतल्यास लढा उभारू

*माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१३-:* साऊथ कोकण डीस्टलरीज या ‘दारू फॅक्टरी’तील काचेच्या बाटल्या व काचा स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात पुरामुळे विखुरल्या गेल्यान शेतीचे नुकसान झाले आहे. याची दारु कंपनीकडून व प्रशासनाकडून योग्य दखल घेतली न गेल्यास प्रशासनाविरोधात संपूर्ण गावाला घेऊन लढा उभारू, यात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याला पुर्णपणे…

Read More

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे दिविजा आश्रम असलदेला जीवनावश्यक वस्तू वाटप

*⚡कणकवली ता.१३-:* चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, “चिंचपोकळीचा चिंतामणी”यांच्यावतीने स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा आश्रम असलदेला जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व आश्रमासाठी लागणारे इतर साहीत्याचे वाटप करण्यात आले. केवळ उपदेश न देता प्रत्यक्ष मदत नव्हे तर आपले कर्तव्यच आहे उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारी एक संस्था म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी ‘परमेश्वर हा सर्वत्र व्यापलेला…

Read More

गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी पद्मजा चव्हाण-बढे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

*⚡कणकवली ता.१३-:* कणकवलीच्या तत्कालीन डीवायएसपी पद्मजा चव्हाण – बढे यांना पोक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्याच्या सर्वोत्कृष्ट तपासासाठी केंद्र शासनाकडून दिले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पदक -2021 जाहीर झाले आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच अंमलदाराना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात येते….

Read More
You cannot copy content of this page