विविध रंगतदार कार्यक्रमांनी सजले साहित्य संमेलन
⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुका येथील साहित्य संमेलनाच्या दुस-या सत्रात किरातच्या संपादिका सीमा मराठे यांनी वि.वा.शिरवाडकर लिखित ‘वीज म्हणाली धरतीला‘ या नाटकातील राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारून उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवली. याचे निवेदन निर्जरा पाटील हिने केले. त्यानंतर सांगलीहून आलेले कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात सिंधुदुर्गातील बारा कवींचा सहभाग होता. विठ्ठल कदम, सुधाकर ठाकूर, सरिता पवार,…
