Headlines

Global Maharashtra Breaking News

पाण्याच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर…

डॉ. श्रीकृष्ण पारकर यांना डॉक्टरेट,विशेष गौरव पुरस्कार प्रदान… ⚡मुंबई ता.२८-: यु आर एज्यूकनेक्ट (UREDUCONNECT), दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित भव्य इंडो-युरोपियन समिट (INDO-EUROPEAN SUMMIT)आणि पुरस्कार सोहळा पार पडला.या सोहळ्यामध्ये हिल अॅकॅडमी, कॅनडाच्या प्रमुख समुपदेशन डॉ. राखी कलेस्कर, महिला आंतरराष्ट्रीय नेटवर्क च्या संचालिका सौ. रेखा तिवारी, पेटीयम चे कायदा सल्लागार डॉ. रुहेल चौधरी तसेच…

Read More

मधाचे गाव आंबोली ब्रॅण्ड तयार करा -राठोड…

⚡आंबोली,ता.२८-: मधाचे गाव आंबोली घोषित करण्यात आले आहे. इथल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करा सह्याद्री मधील सर्वात औषधियुक्त मध म्हणून आंबोली ब्रॅण्ड ला अधिक किमत मिळेल असे प्रतिपादन उमेद चे व्यवस्थापक गणेश राठोड यांनी आंबोली येथे केले. मधाचे गाव आंबोली येथे चांदा ते बांदा मधून जिल्हा नियोजन समिती व खादी ग्रामोदयोग मंडळं यांच्या विद्यमानानाने हा कार्यक्रम…

Read More

उन्हाळ्यात १५० हुन जास्त उड्डाणांसाठी फ्लाय९१ सज्ज…

सध्या आठवड्यात होताहेत १०० हुन अधिक उड्डाणे:वर्षभरात ३५०० उड्डाणे आणि १.७ लाख प्रवाशांना सेवा.. सिंधुदुर्ग : गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एमआयए) आधारित फ्लाय९१ ही प्रादेशिक विमान सेवा सध्या आठवड्याला १०० हून अधिक उड्डाणे करत आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात ही संख्या १५० पर्यंत वाढवण्याची योजना विमान सेवा आखात आहे असे सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.फ्लाय९१ने मार्च २०२५ मध्ये…

Read More

सेवा हक्क कायदा ‘दशकपूर्ती’ कार्यक्रम…

नागरिकांना पारदर्शक व कालमर्यादेत सेवा द्या:जिल्हाधिकारी अनिल पाटील.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा देण्यासाठी ह्या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. श्री शेवाळे…

Read More

महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्याकडून सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत…

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला. यानंतर ही रथयात्रा सिंधुदुर्ग येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत…

Read More

बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक…

बाळा आकेरकर: त्वरित बदलण्याची केली महावितरण कडे मागणी.. ⚡बांदा ता.२८-: बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक स्थितीत कलंडला असून तो केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याबाबत माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी लक्ष वेधले असून अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर हा खांब बदलावा अशी मागणी केली आहे.

Read More

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळेचा नील मोरजकर राज्यात तिसरा…

⚡मालवण ता.२८-:मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध (GTS) परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा विद्यार्थी नील शशिकांत मोरजकर याने राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. तसेच श्रीनिधी युवराज तारी हिने राज्यात दहावा व जिल्ह्यात पाचवा, तर श्रावणी भूपेश गोसावी हिने राज्यात चौदावा आणि जिल्ह्यात व तालुक्यात चौदावा क्रमांक मिळवला आहे. गुरुकुल प्रज्ञा…

Read More

मिलाग्रीस प्रशालेमध्ये समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२८-:मीलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे आजपासून दोन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले या समर कॅम्प साठी शाळेच्या मुलांनी उल्लेखनीय उपस्थिती दर्शवली.समर कॅम्पमध्ये मुलांचा विकास मनोरंजनात्मक पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला. या समर कॅम्पचे उद्घाटन आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी फादर नेस्टर ,फादर शेल्डन,आणि फादर इन्फान्सिओ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते प्रशालेचे…

Read More

आंबोलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना चा शुभारंभ…

आंबोली येथे या अभियानासाठी प्रांताधिकारी निकम,तहसीलदार श्रीधर पाटील,मंडळ अधिकारी संजय यादव,सरपंच सावित्री पालेकर,गुलाबराव गावडे,गेळे उपसरपंच विजय गवस,देवयानी परब,स्नेहल कासले,रुपेश उर्फ चंद्रोजी सावंत,मंडळ अधिकारी संजय यादव,तलाठी सुमित घाडी गावकर,नंदकुमार ढेरे,तसेच कृषी विभागाचे साकरे,घेरडे तसेच लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

एसआरएम कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाची आविष्कार कार्यशाळा…

१४ महाविद्यलयातील ४३ विद्यार्थी आणि २४ प्राध्यापक सहभागी.. कुडाळ : बदलत्या काळानुसार संशोधनाची गरज लक्ष्यात घेऊन विध्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ स्मिता सुरवसे यांनी केले . मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी जिल्हास्तरीय आविष्कार…

Read More
You cannot copy content of this page