तिलारी खोऱ्यात हत्ती प्रश्नावर शेतकऱ्यांचा एल्गार…
⚡दोडामार्ग ता.०४-: तालुक्यातील तिलारी खोऱ्यात काजू हंगामात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. केर येथे ग्रामस्थ व वनविभागाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रथम लोकप्रतिनिधींना भेटून प्रश्न मांडण्याचा, ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी १३ सदस्यीय संघर्ष समिती स्थापन करण्याचे ठरले.शेतकऱ्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,…
