Global Maharashtra Breaking News

पत्रादेवी चेकपोस्टवर सव्वा तीन लाखांची दारु पकडली

*💫बांदा दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात पत्रादेवी एक्साइज चेकपोस्टवर अबकारी खात्याने कारवाई केली. या कारवाईत ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुसह १ लाख ८० हजारांचा टेम्पो असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गिरीश डी. जोशी (४५, रा. ठाणे)…

Read More

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी व नववी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

*प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना *💫सावंतवाडी दि.१६-:* मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यलायल समिती नॉयडाद्वारा प्राप्त झाली असून प्रवेशाची सर्व माहिती https://navodaya….

Read More

भाजी विक्रेत्यावरुन पुन्हा वाद चिघळणार..

मार्गशीष सणानिमित्त बाहेर बसलेल्या विक्रेत्यावर उगारले कारवाईचे हत्यार.. सावंतवाडी येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्या वरून पुन्हा एकदा पालिका प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मार्गशीष दिनानिमित्त महिला व्यापाऱ्यांनी बाहेर लावलेल्या दुकानावर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केल्याने महिला विक्रेत्या संतप्त झाल्या स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला दरम्यान…

Read More

नांदगाव येथे हायवे व ठेकेदार कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण सुरू.

*💫कणकवली दि.१६-:* हायवेच्या जवळच घर असल्याने कंपनीने उत्खनन करून माती काढल्याने झाडे कोसळून घरालाही धोका निर्माण झाला असून याबाबत वारंवार लेखी स्वरूपात तक्रारी करूनही कोणीच दखल न घेतल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून नांदगाव तिठा येथील रोहन नलावडे कुटूंबिय या ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सूरू केले आहे . दरम्यान या नांदगाव येथील उपोषण…

Read More

आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ मालवण तालुक्यातील नवीन तीन पुलांची कामे मंजूर

*नाबार्ड योजनेअंतर्गत निधीची तरतूद *💫कुडाळ दि.१६-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाकरिता कुडाळ तालुक्यातील मांडकुली भुईवाडी तेरसे बांबर्डे माळवाडी रस्ता ग्रा. मा. ४३० मध्ये किमी. ०/३०० मध्ये मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुकयातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता ग्रा. मा. ३८० वर किमी ०/९०० मध्ये…

Read More

माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिरापासूनच्या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *💫सावंतवाडी दि.१६-:* माठेवाडा येथील भागिरथीबाई मंदिर ते उभाबाजार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा या मागणीला माठेवाडा येथील नागरिकांना यश आले असून, नगराध्यक्ष संजू परब यांनी या रस्त्याचा शुभारंभ केला आहे. या रस्त्यांवर खड्डे पडल्याने हा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत होता. यावेळी नगरसेवक…

Read More

युवासेना सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिरात १०३ जणांनी केले रक्तदान

कणकवली विधानसभा मतदारसंघात नांदगाव येथे उपक्रम *💫कणकवली दि.१६-:* युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कै.देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शाखा नांदगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री…

Read More

मालवणच्या समुद्रात ३२१ फुट तिरंगा फडकला

लोणंद येथील डोंगर ग्रुपने साजरा केला विजय दिवस : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम *💫मालवण दि.१६-:* भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धुळचारून पाकिस्तान पासुन बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना १६ डिसेंबर १९७१ रोजी घडली. या विजय दिनाला पन्नास वर्ष पुर्ण होत आहेत. त्याचे औत्सुक्य साधून लोणंद (सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या ४१ सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली…

Read More

मळेवाड येथे १९ रोजी भव्य खुली रस्सीखेच स्पर्धा

माऊली कला क्रीडा मंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी : मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळातर्फे भव्य अशी रस्सीखेच स्पर्धा १९ डिसेंबर रोजी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत नजीक आयोजित केली आहे. प्रथमच मळेवाड येथे ही स्पर्धा आयोजित करून क्रीडा रसिकांना एक प्रकारे या मंडळाने मेजवानीच दिली आहे. ही स्पर्धा सहाशे वजनी गटात होणार असून या स्पर्धेची ५०० रुपये प्रवेश…

Read More

जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत मुलांना शाळांमध्ये बोलावू नये-दिलीप तळेकर

सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी;मुले पॉझिटिव्ह झाल्यास जबाबदारी कोण घेणार? *💫कणकवली दि.१६-:* मुले कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास मोठी अडचण होईल.त्यामुळे शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शाळा नको.५० टक्के शिक्षक उपस्थित योग्य आहे.तालुक्यातील सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी.त्यांनतरच पालकांशी शिक्षकांनी संवाद साधावा.जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये,अशी भूमिका सभापती दिलीप तळेकर…

Read More
You cannot copy content of this page