सावंतवाडी तालुक्यात मेघगर्जनेमुळे नागरिकांची धावपळ…
*ð«बांदा दि.०६-:* गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे काहींसा दिलासा मिळाला. दुपारी 3 वाजेपर्यंत ढगाळ वातावरणामुळे उष्मा कमी झाला. बांदा दशक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यातील अनेक ठिकाणी काहीवेळ थंड झुळुझुळू वारा व पावसाचा शिडकावा झाल्याने पल्लवित झालेल्या आशा अखेर मावळल्या. गेल्या दोन दिवसांपासून जमा होणाऱ्या ढगांनी हुलकावणी दिल्याने बळीराजाची धावपळ मात्र सुरू झाली…
