रामेश्वर संस्थानच्या गणपतीला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप…
विसर्जन मिरवणूकीला भाविकांचा लोटला जनसागर.. ⚡मालवण ता.०५-:इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या विघ्नहर्त्याला शनिवारी ३९ दिवसांनी भावपूर्ण वातावरणात सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी विसर्जन करत निरोप देण्यात आला आणि गेले ३९ दिवस विविधांगी कार्यक्रमानी नटलेल्या या गणेशोत्सवाची सांगता झाली. एकोणचाळीस दिवस चाललेल्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले…
