Global Maharashtra Breaking News

त्या” खाण कंपनीवर जप्तीची कारवाई करा…

आमदार दीपक केसरकर यांचे दूरध्वनीवरून खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांना आदेश *⚡दोडामार्ग ता.३०सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या साटेली भेडशी पर्यायी बायपास रस्ता तयार करण्यासाठी नियोजन करावे अशा सुचना माजी पालकमंत्री विद्यमान आमदार यांनी आढावा बैठकीत देवुन कळणे खाण फुटुन तीन महिने झाले तरी शेतकरी बांधव यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. जर कळणे खाण…

Read More

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने बांदा येथे स्वागत

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत बांदा-:राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने बांदा येथे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

Read More

महागाई विरोधात उद्या युवासेनेचे निषेध आंदोलन …

देशात दरदिवशी वाढत असलेल्या महागाई विषयी केंद्र सरकारच्या विरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने सावंतवाडी तालुक्यात युवासेनेच्या वतीने उद्या दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात युवासेना, शिवसेना, तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे…

Read More

मालवण मधील विकासकामांचे उद्या खा. विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन..

मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहराला जिल्हा नियोजन मधून तीन कोटीचा निधी मंजूर होऊन यातील पावणे दोन कोटी निधीतून शहरात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश…

Read More

कळसुलीत श्री स्वामी समर्थ मठाच्या बांधकामाचा 8 नोव्हेंबरला शिलान्यास

*⚡कणकवली ता ३०-:* प्रेमदया प्रतिष्ठानच्यावतीने कळसुली-हर्डी येथे प्रेमदया व्हिलेज रिसॉर्ट शेजारी श्री स्वामी समर्थ मठ बांधण्यात येणार आहे. या मठाचा शिलान्यास सोहळा श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण, शिष्यगण आणि भाविकांच्या उपस्थितीत सोमवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिपावलीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत स्थानिक भक्तांचा हरिपाठ,…

Read More

अखेर गडनदीवर किर्लोस येथे पूल होणार

ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक यांचे मानले आभार *⚡कणकवली ता.३०-:* कणकवली-आचरा मार्गावरील गाव किर्लोस,शिरवंडे गावाशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून किर्लोस गडनदी येथे पूल मंजूर करण्यात आला आहे. मालवण तालुक्यात मोडणाऱ्या गडनदीवर किर्लोस बंधाऱ्याच्या जवळ 120 मीटर लांबीचा व 8 कोटी 28 लाख रक्कम खर्च असलेला मोठा पूल मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया झाली आहे. सदर…

Read More

गोवा बनावटीच्या दारु वाहतूक प्रकरणी कारवाई

*⚡बांदा ता.३०-:* गोवा राज्यातून बांदा – दाणोलीमार्गे सावंतवाडीत बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या कारवर (एमएच १७ क्यू ०८८०) धडक कारवाई करत एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूच्या…

Read More

…आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अबिद नाईक यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही दिली सदिच्छा भेट *⚡कणकवली ता.३०-:* सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या पडत्या काळात अनेक आमिषे येत असतानाही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांशी प्रामाणिक राहत सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गातील नेते अबिद नाईक यांची एकनिष्ठता राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना ज्ञातआहे. म्हणूनच सिंधुदुर्गात दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते अबिद…

Read More

केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजप करत आहे आमच्या नेत्याची बदनामी…

जयंत पाटील यांची टीका… *⚡कुडाळ ता.३०-:* भाजपला लवकरच सत्तेत येण्याची घाई लागली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून एजन्सी मार्फत महाविकास आघाडीतील नेत्यांची बदनामी करत आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपने आमची कितीही बदनामी केली तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला…

Read More

ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याबाबत जलसंपदामंत्री यांचे वेधले लक्ष

ओसरगावच माजी उपसरपंच बबली राणे यांचे ना.जयंत पाटील यांना निवेदन *⚡कणकवली ता.३०-:* ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी नेते अबिद नाईक उपस्थित होते. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील…

Read More
You cannot copy content of this page