Global Maharashtra Breaking News

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या भातशेती नुकसानीची भरपाई नाही

जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी ता २२ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याला १८ महिने होऊन गेले तरी अद्यापही कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही. याबाबत आज कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश पारकर यांनी जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे….

Read More

केळुस उपसरपंच आबा खवणेकर यांचे उपोषण

केळुस कालवीबंदर मोरीच्या दुरुस्तीची मागणी;बांधकामच्या आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे सिंधुदुर्गनगरी ता २२ केळूस-कालवीबंदर येथील श्री.देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी १२ जुलै २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचून गेली. ही मोरी पूर्णपणे खचून गेल्याने धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवी बंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. वारंवार संबधित सर्व खात्यांकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल…

Read More

२८ पासून गावराई येथील साई मंदिराचा वर्धापनदिन सोहळा

सिंधुदुर्गनगरी – प्रतिवर्षाप्रमाणे गावराई- सुकळवाड येथील साई मंदिर १३वा वर्धापन दिन सोहळा 28 ते 30 एप्रिल या कालावधीत भव्य साई पालखी मिरवणूकसह विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे, तरी या वर्धापन दिन कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन साई सेवा समितीचे संस्थापक सल्लागार शेखर वालावलकर यांनी केले आहे. कसाल मालवण रस्त्यावर गावराई सुकळवाड येथील साई…

Read More

पाडलोसमध्ये मोरीपुलाला पडले मोठाले भगदाड

बांदा ता.२२-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस-स्मशानभूमी रस्त्याजवळ असलेल्या मोरीपुलाला सुमारे सहा फुटी भगदाड पडले असून अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा धोकादायक मोरीपुलांना भगदाड पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. पाडलोस-स्मशानभूमी रस्त्याजवळ जुने मोरीपुल असून सद्यस्थितीत धोकादायक बनले आहे. भगदाड पडून आठ…

Read More

पाडलोसमध्ये मोरीपुलच गायब झाल्याने पावसाळ्यात रस्ता उखडण्याची शक्यता

*⚡बांदा ता.२२-:* पाडलोसमध्ये सुरू असलेल्या पाईपलाईन खोदाई कामात चक्क मोरीपुलच गायब झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून रस्ता उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या बेपर्वाइमुळेच असे प्रकार होत असून यास संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर मोरीपुलावर पडलेली माती न हटविल्यास डोंगरावरील सर्व पाणी रस्त्यावर येणार अन भविष्यात नैसर्गिक आपत्तीस आम्हाला तोंड द्यावे लागणार…

Read More

देवगड बसस्थानकातील समस्या तात्काळ सोडवा

अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा : तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी दिले देवगड आगार व्यवस्थापकाना पत्र देवगड ता.२२-:* देवगड बसस्थानक वरील बंद असलेले पंखे,प्रसाधनगृहातील खंडित विद्युत सुविधा,स्वछता,पिण्याचे स्वच्छ पाणी या प्रमुख समस्या तात्काळ निवारण करण्यात येऊन प्रवाशांना पुरेश्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष…

Read More

कणकवलीत 14 भाजपा शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर लावले नामफलक

कणकवली ता.२१ भाजपा स्थापना दिन सप्ताह साजरा करीत असताना कणकवली भाजपा ग्रामीण मंडल मधील 14 शक्तिकेंद्रप्रमुखांच्या घराच्या दरवाजावर शक्तिकेंद्रप्रमुखांच्या नावाचा नामफलक लावण्यात आले आहेत. 14 शक्ती केंद्र प्रमुखच्या घरावर नामफलक लावत कणकवली भाजपा ग्रामीण मंडल हा जिल्ह्यात सर्वात प्रथम कार्यक्रम रावबिला असल्याची माहिती भाजपा कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली. भाजप स्थापना दिन…

Read More

ब्राह्मण समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आम.अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा

ब्राह्मण मंडळ शाखा कणकवलीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन कणकवली ता.२२-:* आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आणि हिंदू धर्मातील धार्मिक संस्कारांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबद्द्दल त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली नायब तहसीलदार एस व्ही राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना कांचन काजरेकर, दुर्गेश काजरेकर, आनंद…

Read More

केंद्र व राज्याच्या आरोग्य विषयक योजनाबाबत जनजागृती करा

कणकवली ता.२२-:* केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. या योजनांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असून या काम लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार असून जन आरोग्य योजना जनतेचा आधार आहे, असे प्रतिपादन आम. नितेश राणे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व…

Read More

तो प्रकार पूर्वनियोजित नाही तर नागरिकांचा उद्रेक…

नागरिकांवरील गुन्हे मागे घ्या; सर्व पक्षीय नेते, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांची मागणी .. सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी शहरातील काही भागात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून २१ एप्रिल रोजी ००.३० ते ३.०० या वेळेत अघोषित भारनियमन केले होते. नागरिकांच्या गाढ विश्रांतीच्या वेळेत कोणतीही पूर्वकल्पना न देता हे भारनियमन केल्याने उन्हाळ्याच्या असहनीय त्रासामुळे शहरातील नागरिक उपमुख्यकार्यकारी अभियंता यांच्या…

Read More
You cannot copy content of this page