Global Maharashtra Breaking News

मालवणात ग्रामपंचायतीना निकृष्ट झेंड्याचा पुरवठा

सरपंच आक्रमक: बिडीओना विचारला जाब मालवण (प्रतिनिधी) हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समिती मार्फत पुरविण्यात आलेल्या तिरंगा झेंड्यांपैकी बहुतांश झेंडे हे नित्कृष्ट दर्जाचे असल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी आज पंचायत समितीत धडक देत हे सर्व झेंडे परत करत गटविकास अधिकारी व पुरवठादार यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतींनी झेंड्यांचे पैसे भरूनही…

Read More

होळकर देवस्थान व महाविद्यालय परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण

वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त ऐतिहासिक स्थळ होळकर देवस्थान परिसर व महाविद्यालय परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करण्यात आले.

Read More

शिरोडा येथून आजादी गौरव पदयात्रा

राष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसने संपूर्ण देशात ‘आजादी गौरव पदयात्रा‘ क्रांतीदिनी म्हणजेच ९ ते १४ ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुक्यात काढण्याचे आदेश दिले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील या पदयात्रेची सुरुवात महात्मा गांधींनी ज्या गावात मिठाचा सत्याग्रह केला त्याच शिरोडा गावातून केला. या पदयात्रेत युवकांबरोबर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read More

कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “हर घर तिरंगा” उपक्रमासाठी जनजागृती

कणकवली 10 ऑगस्ट (प्रतिनिधी)-“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत मिळालेले देशाला मिळालेले स्वातंत्र्य किती महत्वपूर्ण आहे व त्यासाठी स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारींनी केलेले बलिदान यांचे स्मरण केले जात आहे.भारत सरकार मार्फत ‘हर घर तिरंगा, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय…

Read More

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सेल्फी पॉइंट

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी कापली फित;सीईओ प्रजित नायर होते उपस्थित सिंधुदुर्गनगरी ता १०स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद इमारत रंगरंगोटीने नटली आहे. जिल्हा परिषदेच्या एन्ट्री पॉईंटवरील सेल्फ़ी पॉइंट लक्षवेधी ठरला आहे. या सेल्फ़ी पॉइंट चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांअंतर्गत जिल्हा परिषद कार्यालयाच्या एन्ट्री पॉइंटवर व पहिल्या…

Read More

जिल्हा परिषदेच्या स्वच्छ्ता रॅलीला मोठा प्रतिसाद

राजधानीत सीईओ प्रजीत नायर सुद्धा झाले सामील सिंधुदुर्गनगरी ता १०स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद व पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, यांच्या वतीने महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन मुंबई गोवा महामार्ग स्वच्छता मोहिम हाती…

Read More

खालची बाजारपेठ विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताहात प्रारंभ

देवगडयेथील खालची बाजारपेठ श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे सप्तप्रहरांचा श्री हरिनाम सप्ताहास बुधवारी सकाळी १० वाजलेपासून उत्साहात सुरुवात झाली.या मंदिराचे मानकरी अनिकेत दिलीप पारकर यांच्या हस्ते ग्रामोपाध्ये प्रथमेश बोंडाळे यांचे पौरोहित्यखाली विधीवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली .त्यानंतर आरती गाऱ्हाणे होऊन आनंदवाडी ग्रामस्थ भजन मंडळ यांनी मानाप्रमाणे श्री हरिनाम सप्ताहास प्रारंभ केला.या वेळी आनंदवाडी गावचे पाटील…

Read More

स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्या माहितीपर ग्रंथाचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक

भिकाजी सामंत;मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन सोहळा संपन्न ⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर, समाजसेवक, क्रांतिकारक यांच्या माहितीपर ग्रंथाचे प्रदर्शन युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, कै. उदय खानोलकर वाचन मंदिराने राबविलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन ग्रंथ प्रदर्शन उदघाटनप्रसंगी मळगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री भिकाजी सामंत…

Read More

कासार्डे विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत समुह राष्ट्रगान

⚡कणकवली ता.१०-: कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे व ग्रामपंचायत कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आणि ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स.११वा समूह राष्ट्रगानचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे गावचे सरपंच बाळाराम तानवडे, ग्रामविकास अधिकारी श्री. कोलते, विद्यालयाचे…

Read More

नांदगाव तिठा येथे जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियान रॅलीचे स्वागत.

⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रशासनाची स्वच्छता अभियान रॅलीला नांदगाव तिठा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.यामध्ये तोंडवली येथील नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य विरांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी तणपुरे, राजेंद्र पराडकर, ठाकूर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी वारंग,सुनील पांगम, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,…

Read More
You cannot copy content of this page