राष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन
वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसने संपूर्ण देशात ‘आजादी गौरव पदयात्रा‘ क्रांतीदिनी म्हणजेच ९ ते १४ ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुक्यात काढण्याचे आदेश दिले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील या पदयात्रेची सुरुवात महात्मा गांधींनी ज्या गावात मिठाचा सत्याग्रह केला त्याच शिरोडा गावातून केला. या पदयात्रेत युवकांबरोबर महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, उपाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष नागेश मोर्ये, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, मिडिया कोकण समन्वयक केतनकुमार गावडे, ओबीसी विभाग प्रदेश सचिव अमिदी मेस्त्री, महिला प्रदेश पदाधिकारी विभावरी सुकी, पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, अरविद मोंडकर, अजिंक्य गावडे, गोविंद कुंभार, चंद्रकांत राणे, सुधीर मल्हार, जेम्स फर्नांडिस, वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, स्मिता वागळे, समाधान बांदवलकर, अण्णा गावडे, आबा मयेकर, गौरेश राऊत, सारीका वेंगुर्लेकर, संकेत वेंगुर्लेकर, विशाल वेंगुर्लेकर, धीरज घाडी, कलीम खान, साईराज परब, दिपक मोबारकर, मिठ्ठू मकानदार, दिपक चोपडेकर, सुदर्शन कुंभार, सत्यवान कुंभार, आबा मसूरकर, संजय आचरेकर, महेश कुंभार, कौशल नाईक, ओंकार कदम, अक्षय कुंभार, आनंद मसूरकर, अभिजीत राणे, मयुर कुंभार, उत्तम चव्हाण, श्रावणी परब, यश परब, ओमसाई कुंभार, आयुष परब, विशाल गावडे, सर्वांगी राऊत, सुमीत राऊत, अमोल राऊळ, आत्माराम घाडी, स्वप्नाली राऊत, नंदिनी आचरेकर, मोहन नंदगडकर, किशोर राऊत, संतोष कांबळी, सुमित कुबल, भाऊ गावडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
