Global Maharashtra Breaking News

मालवण नगरपरिषदेच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र शासनाकडून दखल ⚡मालवण ता.१८-: कचरा मुक्त शहर हि संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमाची घोषणा केली असून या कार्यक्रमांतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस सेवाभावी संस्था, हॉटेल व्यावसायिक, लोकप्रतिनिधी,…

Read More

विद्युत रोहित्रावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार…

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधीपर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या तारकर्ली – देवबाग या गावाच्या हमरस्त्यावरील विजवितरण कंपनीचे बहुतांश विद्यूत रोहित्र (डी पी ) हे धोकादायक बनले असून अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. विज वितरण कंपनीने केलेल्या या दुर्लक्षामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास विज वितरण…

Read More

सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी विलास गावडे

⚡वेंगुर्ला ता.१८-: मातोश्री कला, क्रीडा मंडळ दाभोली नाका-वेंगुर्ला यांच्यातर्फे साज-या होणा-या श्री देवी नवदुर्गा मातोचा सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२२ समितीच्या अध्यक्षपदी विलास गावडे तर उपाध्यक्षपदी संदेश निकम यांची निवड करण्यात आली. फोटो – विलास गावडे, सदेश निकम

Read More

विरोधकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन द्यावे

हा प्रकल्प होण्यासाठी आम्ही चर्चेला तयार;विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१८-: वेदाता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोध करणाऱ्या विरोधकांनी रत्नागिरी येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करावे, त्यासाठी एकत्र बसून आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. या प्रकल्पातून २…

Read More

सही पोषण देश रोशन उपक्रमाचा शुभारंभ

बांदा निमजगा अंगणवाडी केंद्रातील उपक्रम बांदा/प्रतिनिधीबांदा निमजगा येथील अंगणवाडीत ‘सही पोषण देश रोशन’ या उपक्रमातर्गत मुलांसाठी पौष्टिक आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुलांना अंगणवाडी सेविका पालकांनी स्वतः शिजविलेले पौष्टिक अन्नपदार्थ देण्यात आले.यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, डॉ. आरती चिटणीस, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वप्नाली पवार, आरोग्य सेवक श्री….

Read More

आजगाव, मळेवाड, धाकोऱ्यात पर्यावरणास हानिकारक प्रकल्प नको

जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक : ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रा.पं.ने परवानगी देऊ नये ⚡बांदा ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणाला हानी पोहोचविणारा एक खनिज प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील भातशेती तसेच घरांचीही हानी होणार असल्याने याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायतने अशा पर्यावरणास हानीकारक…

Read More

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात १७ जणांचे रक्तदान

⚡सावंतवाडी ता १८-: रक्तदान अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भारताच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा- सावंतवाडी यांच्या मार्फत शनिवार दि.१७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी १७ जणांनी रक्तदान करून जादूई आकडा गाठला. रक्तदान अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदान शिबिरासाठी १७ सप्टेंबर ही…

Read More

पुंडलिक दळवी यांच्यावरील हल्ला निंदनीय

राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा अर्चना घारे – परब ⚡सावंतवाडी ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष,श्री. पुंडलिक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आणि निषेधार्ह आहे. सावंतवाडीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. अशा घटना पुन्हा घडू नये याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठीच संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहीजे आशी मागणी कोकण विभाग महिला आघाडीचे अध्यक्ष…

Read More

कणकवली शहरात आणखी एक नवीन रस्ता साकारणार

प्रांत कार्यालयाच्या बाजूने कॉलेज रोडला जोडणार; वाहतूक समस्या मिटणार ⚡कणकवली ता.१८-: विकासाचा मार्ग हा रस्ते ठरवित असतात याची प्रचिती कणकवली शहरात येऊ लागली असून आता कणकवली शहरात अजून एक नवीन रस्ता अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कणकवली शहरातील प्रांत कार्यालयाकडून ॲड. उमेश सावंत यांच्या घरालगत ते प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस कॉलेज रोडला जोडणारा…

Read More

लेखन कौशल्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त

संजीवनी फडके;कणकवली नगरवाचनालयातर्फे निबंध लेखन कार्यशाळेचे आयोजन ⚡कणकवली ता.१८-: लेखन कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी निबंध लेखन कार्यशाळा उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन लेखन कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन कार्यशाळा घेण्याचानगरवाचनालयाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिक्षिका संजीवनी फडके यांनी केले. कणकवली येथील नगरवाचनालय हॉलमध्ये नगरवाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध लेखन कार्यशाळा…

Read More
You cannot copy content of this page