Headlines

Global Maharashtra Breaking News

अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून एक निर्दोष

मालवण दि प्रतिनिधी मालवण कसाल रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संगप्पा धर्मु राठोड याची मालवण न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपी तर्फे ऍड. स्वरूप पई यांनी काम पाहिले. संगप्पा धर्मु राठोड याने आपल्या ताब्यातील…

Read More

सडूरे आरोग्य केंद्र इमारतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील

तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांचे आश्वासन वैभववाडी संजय शेळकेसडूरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारत बांधकामासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील तसेच बाह्य रुग्ण विभागा विभागाच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्यक सेवा तात्काळ उपयोग करून दिली जाईल असे. आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल पवार यांनी दिली नंतर सडूरे, शिराळे, अरुळे,निम अरुळे,सागुळवाडी,व नावळे ग्रामस्थांनी आपले…

Read More

तुषार दरवेस मुंबईला जाताना हृदय विकाराने निधन

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कट्टा गावचे सुपुत्र भांडुप मुंबईस्थित तुषार शांताराम दरवेसयांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि. १७ मे रोजी मुंबईकडे परत असताना वैभववाडी येथे दुःखद निधन झाले.ते ५५ वर्षांचे होते. मुलांना सुट्टी असल्याने ते देवगड आणि कोकण परिसरात भ्रमंती करण्यात करिता आले असता , त्यांना थोडासा त्रास जाणवू लागला. औषध उपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्यांनी…

Read More

कुणकेश्वर समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू

मित्रांसमवेत गेला होता पोहण्यासाठी देवगड (प्रतिनिधी)मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पाेहण्यासाठी गेलेलास्वराज सुनिल पेडणेकर(२१)रा.कुणकेश्वर चांदेलवाडीहा युवक पोहताना बुडाला.आणि त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी४.३० वा.सुमारास सापडला.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा मित्रांसमवेतगुरूवारी दुपारी ३.३० वा.सुमारास मारूती मंदीराखालीकुणकेश्वर समुद्रात पाेहण्यासाठी गेलाहाेता.चाैघेजण पाेहत असतानाच स्वराज हालाटाबराेबर पाण्यात ओढला गेला.मित्रांनीवाचविण्यासाठीआरडाओरड केली मात्र ग्रामस्थघटनास्थळी धावून येईपर्यंत ताे पाण्यातबुडाला.घटनास्थळी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांनीगर्दी केली हाेती.सर्व ग्रामस्थांनी…

Read More

बहुजन मुक्ती पार्टीची जनसंपर्क परिवर्तन यात्रे निमित्त 19 रोजी सावंतवाडी सभा

⚡बांदा ता.१८-: बहुजना जागा हो, या सत्तेचा धागा हो हे ब्रीदवाक्य घेऊन या सत्तेच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचा चाललेला जनसंपर्क परिवर्तन यात्रे निमित्त सावंतवाडी गांधी चौक येथे दि. १९ मे रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी करणार आहेत. इतर…

Read More

आंबोली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ६४ टक्के मतदान

५०१ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क ⚡आंबोली, ता.१८-: येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणूक चुरशीने मतदान झाले.७७२ पैकी ५०१ मतदान झाले.६४.९ टक्के मतदान झाले.महिला २५१ आणि २५० मतदान झाले. या ठिकाणी केंद्रावर निवडणूक अधिकारी,दीपक राऊळ,उदेश नाईक,बापूशेट कोरगावकर,हौसा गवस मॅडम, मंडळ अधिकारी जी आर गुरव,तलाठी प्रवीण पोले, कोतवाल लाडू गावडे, या बंदोबस्तासाठी पोलिस उपनिरीक्षक श्री यशवंते,…

Read More

कालव्याच्या पाण्यासाठी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची तिलारी कार्यालयावर धडक

पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे अभिवचन ⚡बांदा ता.१८-: भर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असताना तिलारी कालव्यातील पाणीपुरवठा बंद केल्याने मडुरा दशक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी तिलारी कालवा कार्यालयावर धडक दिली. परिसरात पाणी संकट असताना अचानक पाणी सप्लाय बंद केल्याने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना जाब विचारला. ओटवणे भागात कालवा दुरुस्तीची कामे सुरु असल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे अभियंता…

Read More

भटवाडीतील रस्त्याची कामे तात्काळ पुर्ण करा…

दिपाली भालेकर ; पालिका प्रशासनाला निवेदन ⚡सावंतवाडी ता.१८-: भटवाडी परिसरातील रस्त्याची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी याबाबतचे निवेदन दिले असून, रस्त्यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारे स्वच्छ करणे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडे तोडणे इत्यादी कामे लवकरात लवकर करावीत. तसेच रस्त्यांवर…

Read More

तळेरे येथे रंगला”गझल नानिवडेकरांची” कार्यक्रम

⚡कणकवली ता १८-: गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांची जयंतीनिमित्त तळेरे येथे “गझल नानिवडेकरांची” हा कार्यक्रम प्रज्ञांगण परिवाराने आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिध्द गझलकार, ऊत्तम माणूस, मार्गदर्शक, पत्रकार आणि चांगला मित्र असे नानिवडेकर यांचे विविध पैलू मांडताना त्यांच्या अनेक गझलांचे सादरीकरण करण्यात आले. यानिमित्त नानिवडेकर यांच्या विविध आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक श्रावणी कंप्यूटरचे संचालक…

Read More

भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे
७ वर्षे थकीत पगार मिळाले

कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार ⚡कणकवली ता.१८-: राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तसेच सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page