बांद्यात रक्तदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३० रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…
⚡बांदा ता.१४-: रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. रक्ताचा साठा उपलब्ध राहण्यासाठी समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान हेच सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून अशा उपक्रमांमुळे समाजात मानवतेची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे केले.जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान…
