ज्ञानाबरोबर रूजलेले संस्कार भविष्यात आत्मिक समाधान देईल-:विलास हरमलकर…
⚡वेंगुर्ला ता.३०-: ग्रामीण भागातील शाळेची दहावी परीक्षा १०० टक्के निकालाची परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळविलेल्या ज्ञानाबरोबरच रूजलेले संस्कार, सद्भावना, नितीमूल्ये भविष्यात यशाबरोबरच खरेखुरे आत्मिक समाधान देईल असे उद्गार उद्योजक विलास हरमलकर यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी काढले. फोटोओळी – अणसूर पाल हायस्कूलमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
