शासनाला मच्छीमारांची फिकीर नाही
मच्छीमारांची व्यक्त केली नाराजी *ð«मालवण दि.२२ -:* केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारनी पारंपरिक मच्छीमारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. मच्छीमारांसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या ठिकठिकाणच्या दीपस्तंभाचा प्रकाश मंदावला आहे. बंदरांमधील मार्गदर्शक दिवेसुद्धा बंद स्थितीत आहेत. मात्र दुसरीकडे एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा लखलखाट सुरू आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांची जाळी तोडून नेत आहेत. पण…
