Headlines

“त्या” रुग्णवाहिकेचे पालकमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

*⚡सिंधुदुर्गनगरी ता २७-:* राज्य सरकारच्या आपत्ति व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका मिळाल्या असून या रुग्नवाहिकांचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 71 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 271 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 146 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 71 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणार :समीर नलावडे

साई सुरभी बेस्ट हॉटेल तर मामाचो गांव बेस्ट अग्रो टुरिझमने सन्मानित *⚡कणकवली ता.२७-:* कणकवलीत दर वर्षी पर्यटन महोत्सव आयोजित करत आहोत,नगरपंचायत पर्यटन दृष्टीने उपक्रम कणकवलीत राबविले जात आहेत.कणकवलीत धबधबा निर्माण करण्याचे काम नगरपंचायतने हाती घेतले आहे . त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था ,फेडरेशन अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांना…

Read More

झारापमधील कॅन्सरग्रस्त व्यक्तीला दहा हजाराची मदत

कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा मदतीचा हात *⚡सावंतवाडी ता.२७-:* कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट , मुंबई यांच्या माध्यमातून झाराप येथील लक्ष्मीकांत सामंत या ४८ वर्षीय कॅन्सर ग्रस्त रुग्णाला औषधोपचारासाठी १० हजार रूपयांची आर्थिक मदत केली असून, त्याचा धनादेश त्यांच्या पुतण्याकडे डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे.

Read More

बैलगाडी शर्यती व बैलांची झुंज कार्यक्रमाला परवानगी मिळावी

आ.नितेश राणे यांची पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.२७-:* कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत . आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत . वर…

Read More

कोळोशी-आयनल-असलदे गावात तलाठी द्या

ग्रामस्थांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील कोळोशी आयनल असलदे गावात तलाठी नसल्याने गावातील बहुतेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावांना लवकरात लवकर तलाठी मिळावा अन्यथा कोतवालांला तलाठी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार यांची भेट देऊन दिले….

Read More

१७ दिवसांच्या सेवेनंतर वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या गणरायाला निरोप

*⚡वेंगुर्ले ता.२७-:* वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री निरोप दिला. गणेशोत्सव असो किंवा दिवाळी प्रत्येक वेळी समाजाच्या संरक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या घरी सण साजरे करण्याचा अवधी फार कमी मिळतो. पोलिसांनाही आपल्या घरच्या उत्सवाप्रमाणे गणेशोत्सवात सहभागी होता यावे यासाठी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली….

Read More

राज्यावर सुरू असलेली संकटांची मालिका आता थांबू दे

पालकमंत्री उदय सामंत यांनी रिक्षा संघटनेच्या गणेशाचे घेतले दर्शन *⚡कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी ‘राज्यावर सुरू असलेली संकटांची मालिका आता थांबू दे’, असे साकडे कणकवलीच्या राजासमोर नाम. उदय सामंत…

Read More

कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देणार

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय;आमदार वैभव नाईक यांची माहिती *⚡ओरोस ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुरज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले….

Read More

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्या पण प्रथम पायाभूत सुविधा निर्माण करा

विमानतळाचे खरे श्रेय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचेच:राजन तेली *⚡कणकवली ता.२७-:* चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे. त्यामुळे चिपी विमानतळाचा पाया रचणारे नाम.नारायण राणे हे मंत्री व्हावेत व त्यांच्याच मंत्री पदाच्या काळात विमानतळाचे उद्घाटन व्हावे हे नियतीनेच ठरविले होते.त्यामुळे शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी…

Read More
You cannot copy content of this page