दहिबाव जलस्त्रोतांची पाण्याची पातळी घटल्याने पाणी प्रश्न पुन्हा गंभीर…
⚡देवगड ता.१६-: दहिबाव नळयोजनेवर एका मागून एक संकट येत असतानाच आता या योजनेच्या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने देवगड जामसंडे वासियांचा पाणी प्रश्न पुन्हा गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. सात दिवसापूर्वीच पंपिंग यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड व त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीबाव कुपलवाडी येथे जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडे चा पाणीपुरवठा सात दिवस बंद होता.दरम्यान जलवाहिनी व…
