शासकीय विश्रामगृहाला १० कोटी केले खर्च…
पहिल्याच पावसात लागली गळती:आमदार वैभव नाईक यांच्याकडून कणकवली येथील विश्रामगृहाच्या कामाचा पोलखोल.. ⚡कणकवली ता.०८-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे. दोन महिन्यां पूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था…
