कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.२६-: बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत भारीत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. विद्या वामन बिले (वय ६०) असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत बांदा ग्रामस्थ आक्रमक झालेत. यावेळी मयताच्या वारसाना रोख दहा लाख रुपये भरपाई द्या अशी मागणी…

Read More

बोट दुर्घटनाग्रस्त रेडकर यांची मंत्री केसरकर यांनी घेतली भेट…

वेंगुर्ले: वेंगुर्ला बंदर येथे वादळी वाऱ्यामुळे छोटी होडी बुडून झालेल्या २३ मे रोजी रात्री झालेल्या दुर्घटनेत दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांच्या लॉन्च वर काम करणाऱ्या ४ खलाश्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आज २५ मे रोजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मच्छिमार बाबी रेडकर यांची त्यांच्या घरी भेट घेऊन विचारपूस केली.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, अतिशय…

Read More

आंबोली, बांदा, वेंगुर्ले मंडळ अध्यक्ष तेच राहणार…

जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२५-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील बांदा, आंबोली व वेंगुर्ले मंडल अध्यक्षांच्या करण्यात आलेल्या निवडीला भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी स्थगिती दिली आहे. मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून ती स्थगिती उठवण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली. दरम्यान,…

Read More

कोकण पदवीधर मतदार नोंदणी करण्यास अजूनही २८ मे पर्यंत मुदत…

सध्या १७४८४ मतदार:२६ जून रोजी मतदान;जिल्हात २५ मतदान केंद्र,जिल्हाधिकारी किशोर तावडे… ⚡ओरोस ता.२५-: महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी २०२४ रोजी १७४८४ पदवीधर मतदार नोंदणी झालेली मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. तर ६५७ पदवीधर मतदारांचे अर्ज ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने दाखल…

Read More

असलदे सोसासटीच्या बैठकीत कर्ज विषयावर चर्चा…

बैठकीनंतर खत विक्रीचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.२५-: असलदे रामेश्‍वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बैठक पार पडली. यात कर्ज विषयावर चर्चा झाली. सोसायटीचे कर्ज उचल शेतकर्‍यांचा सातबारा व अन्य कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटीच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. सदर बैठक चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, उपसरपंच…

Read More

अन्यथा कार्यालयात झोपून करणार आंदोलन…

काका परब यांचा इशारा ः पाडलोसमध्ये चौथ्या दिवशीही वीजपुरवठा ठप्प.. ⚡बांदा ता.२५-: वादळी पावसात पाडलोसमध्ये मोठे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान वीज वितरणचे झाले. परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेस चौथा दिवस उजाडतो हे वीज वितरणचे अपयश आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी अधिकार्‍यांचे फोन दोन दोन दिवस बंद असतात. त्यामुळे संपर्क करायचा तरी कुठे? काही अधिकारी उद्धट उत्तरे…

Read More

भाजप युवा मोर्चा बांदा,वेंगुर्ले व आंबोली मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द…

राहूल लोणीकर यांचा जिल्हाध्यक्षांना आदेश ; कोण होणार नवीन मंडल अध्यक्ष..? सर्वाचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२५-:भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील नुकत्याच नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या युवा मोर्चाच्या बांदा आंबोली व वेंगुर्ले मंडल अध्यक्षांच्या निवडीला भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष. दरम्यान सावंतवाडी विधानसभा…

Read More

नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुली गावात तीन दिवस वीज पुरवठा गायब…

वीज वितरणला विचारणार जाब: ग्रामस्थांचा इशारा.. ⚡बांदा ता.२५-: महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुली गावात गेले तीन दिवस वीज पुरवठा गायब आहे. महावितरणचे सब स्टेशन इन्सुली गावात असून सुद्धा इन्सुली वासीयांना काळोखात रहावे लागत असेल तर इतर गावांचा वीजपुरवठा कसा सुरळीत करणार असा सवाल उपस्थित होत आहे. तर याबाबतचा जाब वीज वितरणला विचारणार असा इशारा ग्रामस्थांनी…

Read More

विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासावे…

प्रणय तेली यांचे आवाहन:तळेरे येथे हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण.. कणकवली ता.२५-: आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धेय्य, आवड, निरीक्षण, जिद्द आणि प्रत्येक क्षणी जाणीव असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगीत व गीतकार…

Read More

गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल…

प्रभाकर हडकर यांचे प्रतिपादन ः मसुरे येथे संयुक्त जयंती महोत्सव.. ⚡कणकवली ता.२५-: तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांचे आचार व विचार तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे. गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा शांतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन प्रभाकर हडकर…

Read More
You cannot copy content of this page