सावंतवाडी ता.२२-: कोलगांव पाठोपाठ ओटवणे येथे रविवारी रात्री अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. एकाच कुटुंबातील तिघांना याचा त्रास जाणवल्यानंतर त्यांना रात्रीच त्वरीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. आता दोघांची प्रकृती स्थिर आहे.
ओटवणेतही अळंबी खाल्याने तिघांना विषबाधा…
