रुपेश राऊळ:भाजपने मतदारसंघासाठी काय केलं ? हे राजन तेलींनी सांगावं..
सावंतवाडी ता.०३-: जनतेच्या कर्तव्याची जाणीव स्थानिक आमदारांनी ठेवावी. केवळ पार्टनरशीपसाठी स्वकीयांच्या भल्यासाठी काम मंत्री दीपक केसरकर यांनी करू नये. जनतेच्या व्यथा जाणून घेऊन आमदाराची कर्तव्य पार पाडावी. असा टोला तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला.
दरम्यान राजन तेली यांनी केसरकरांची तक्रार करताना राज्यात सत्ता असताना भाजपने मतदारसंघासाठी काय केलं ? हे देखील तेली व संजू परबांनी सांगावं. त्यामुळे सर्वसामान्य जनतेन येणाऱ्या विधानसभेत या लोकांना जागा दाखवून द्यावी असं मत उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केल. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
