उदय सामंत यांचा टोला: आमच टार्गेट हे ठाकरे सेना आहे..
⚡सावंतवाडी ता.०२-: आमचं टार्गेट हे ठाकरे सेना आहे, त्यामुळे कोणीही मित्र पक्षांच्या नेत्यांवर वैयक्तिक आरोप टीका टिपणी करत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत जाऊ नये असा टोला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राजन तेली यांचं नाव न घेता लगावला.
दरम्यान महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेऊन अशा प्रकारचे वक्तव्य करू नये असे ते यावेळी म्हणाले ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
