Headlines

उमेदवार कोण याची चर्चा नको, देतील त्याला मताधिक्याने निवडून द्यायचेय…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन:मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरीत संपन्न झाली संवाद बैठक

सिंधुदूर्गनगरी ता.०९-: मोदी @9 अभियान राबविण्यात येत आहे यानिर्मितभाजपाची कार्यकर्ता सवाद बैठक ओरोस शरद कृषी भवन येथे झाली या ‘टिफिन पार्टी’ बैठकीलाकेंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती होती केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आपल्या भाषणा मध्ये मोदी @9 अभियान प्रमोद जठार यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी राबविला याला नाव ठेवायला जागा ठेवली नाही याबदल भाजपा पदाधिकाऱ्यांचे राणेंनी कौतुक केले आपलं अस्तित्व ठेऊन सरकार चालणार आहे , सरकार मजबूत करून राज्याचा विकास करणारा भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे सर्वांचा ओढा भाजपाकडे आहे, येतील त्यांना सामावून घेऊ , यासह राज्यातील राजकीय घडामोडीवर त्यानी स्पष्ट भूमिका केली,.

भारत महासत्तेकडे जातोय भारत 2030 साली तिसऱ्या क्रमांकावर येईल त्यासाठी आपणा सर्वाना मेहनत घ्यावी लागणार आहे पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनीही ते आव्हान स्वीकारले आहे.

आपला पक्ष जगात मोठा आहे व आपले पंतप्रधान जगात लोकप्रिय आहेत आपले चापुढील सरकार सतेत येणार असून खासदार  मोठ्या मताधिक्याने निवडून यायला हवा उमेदवार कोण असणार याची चर्चा नको जो उमेदवार असेल तो मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला पाहिजे कोणतेही गट तट, जाती पातीचे राजकारण नको फक्त एकच भाजपा पक्ष मजबुत कर देशात आपल्या सिध दुर्गातील कामाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी कौतुक करायला हवे, असे काम करा पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सुखी समाधानी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेच्या हितासाठी करत आहे आपणही योजना तळागाळापर्यत पोहोचवून काम करा कोकणी माणूस सुखी समाधानी व्हायला पाहिजे आपले सरकार मुलांच्या शिक्षणासाठी काम करतोय विरोधकांकडे व्हिजन नाही , पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान कारायचे आहे त्यासाठी अंतर्गत वाद मिटवा पक्षासाठी सर्वांनी एकजूट दाखवा एक मनाने आणि एक दिलाने काम करा असे आवाहन नारायण राणे यांनी केले

You cannot copy content of this page