*बचत गटातील महिलांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सुरू

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली योजना*

*💫वेंगुर्ले दि.२८-:* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज विविध प्रकारच्या उद्योगासाठी जाहीर केले. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ( पीएमएफएमइ ) सन २०२० ते २०२५ या पाच वर्षे कालावधीसाठी सुरु केली आहे. सदर योजने अंतर्गत डे – एन आर एल एम मधील स्थापित समुह जे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या व्यवसाय वृद्धी करीता बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे .सदर योजनेसाठी कृषी विभाग – महाराष्ट्र शासन हा नोडल विभाग व कृषी आयुक्तालय – पुणे हे नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहेत.पी एम एफ एम इ योजनेमार्फत अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगामधील स्वयं सहाययता समुहांसाठी विशेषतः प्राधान्य देण्यात आलेले आहे .या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाययता समुह , ग्रामसंघ, प्रभाग संघ यांना भांडवल गुंतवणुकीसह संपूर्ण मूल्यवर्धक साखळीमधील गुंतवणूकीवर ३५ % पर्यंत क्रेडिट लिंक ग्रांट उपलब्ध होणार आहे . तसेच ४०,००० रुपये प्रति स्वयं सहाययता समुह सदस्य अशा पध्दतीने बीज भांडवल ( सीड कॅपिटल ) देण्याची तरतूद आहे.या व्यतिरिक्त अन्नपदार्थ प्रक्रिया मधील उद्योगांसाठी आवश्यक एकत्रित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी , स्वयं सहाय्यता समुह , ग्रामसंघ , प्रभाग संघ यांना ३५ % पर्यंत क्रेडिट लिंक ग्रांट उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. समुदाय संस्थेसाठी बीज भांडवल ( सीड कॅपिटल ) संपूर्णतः अनुदान स्वरुपात असून लाभ घेणाऱ्या समुह सदस्यांसाठी हे बिज भांडवल ( सीड कॅपिटल ) वार्षिक ३%च्या व्याज दराने कर्ज स्वरुपात असणार आहे. सदर कर्जाचा परतावा करताना व्याजाची विभागणी – १% स्वयं सहाय्यता समुह , १% ग्रामसंघ व १% प्रभागसंघ या स्वरूपात असणार आहे.तरी या योजनेचा जास्तीत जास्त बचतगटांच्या महीलांनी फायदा घेऊन आत्मनिर्भर बनावे,असे आवाहन वेंगुर्ले महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा माजी पं. स.उपसभापती स्मिता दामले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page