राजन तेली: शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यास अपयशी
⚡सावंतवाडी ता.०५-: जिल्ह्यातील शिक्षण खात्यातील प्रश्न सोडवण्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे लगावला.दरम्यान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून त्यात काय त्रुटी असतील ते राजघराण्याशी बोलून ते दूर केले जाईल त्यामुळे तो प्रश्न सुटला असे म्हणता येणार नाही असे ही तेली यावेळी बोलताना म्हणाले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
