राष्ट्रीय महामार्गाची यंत्रणा शुशोगात; तात्काळ रिफ्लेक्टर लावा; ग्रामस्थांची मागणी
⚡सावंतवाडी ता.०३-: मळगाव येथे झाराप -पत्रादेवी महामार्ग वर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी रिप्लेक्टर न लावल्याने वाहनांचे अपघात होत आहेत.रात्री साडेआठ वाजता सुदैवाने दुचाकीवरील दोन युवक बाल बाल बचावले असून मात्र झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. सदर कामाच्या बाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सुशोगात असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणाचातरी बळी जाऊ शकतो त्यासाठी तात्काळ कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व आवश्यक यंत्रणा उभी करा अशी मागणी ग्रामस्थातून वाहन चालकातून होत आहे.
