खा राऊत श्रेय घेण्यासाठी खोटे बोलून दिशाभूल करीत आहेत;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.३०-: प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत मंजूर झालेले रस्त्याची कामे ही भाजपच्या माध्यमातून सुरू झाली आहेत. मात्र खासदार विनायक राऊत आपल्या माध्यमातून मंजूर झाल्याचे नाहक सांगत जनतेची दिशाभूल करून श्रेय घेण्याच प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला आहे.
