छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा…

सीताराम गावडे; अन्यथा कदंबा बसेस सावंतवाडीत येऊ देणार नाही

*⚡सावंतवाडी ता.०१-:* चंदगड कोल्हापूर मधील पर्यटकांना म्हापसा गोवा येथे लुबाडून त्याने आपला पत्ता महाराष्ट्र असे सांगताच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक बोलून त्या युवकांना बेदम चोपले, छत्रपतींचे नाव घेऊन राज्य व देशाचा कारभार करणाऱ्या सरकारने याबाबत कठोर कारवाई करावी, अन्यथा छत्रपतींचे मावळे अशा भेकड वृत्तीला सडेतोड उत्तर देतील किंबहुना गोवा राज्यातील कदंबा बसेस सावंतवाडी येऊ देणार नाही,असा इशारा सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिला आहे. ‌

मतदान आले छत्रपती शिवाजी महाराज की जय याची आठवण होते, मतदान झाले की छत्रपतीला विसर पडतो हा इतिहास आहे, मात्रेत सर्वच राजकीय पक्षांना छत्रपतींच्या जीवावरच मते मागावी लागतात, छत्रपतीच्या नावावरच पक्षातील नेते मंडळी सत्तेत बसतात, हे त्यांनी विसरू नये, गोवा असो कर्नाटक असो प्रत्येक राज्यात नव्हे तर देशात छत्रपतींचा आदरच केला जातो, मात्र ज्या ठिकाणी छत्रपतींचा अनादर होत असेल व त्या ठिकाणचे सरकार मुग गिळून गप्प बसेल तर शिवरायांचे मावळे हे कदापि सहन करणार नाही त्याचे योग्य उत्तर योग्य वेळी निश्चितच दिले जाईल व त्याला शासन जबाबदार राहील असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला आहे.

म्हापसा गोवा येथे पर्यटकांना लुबाडणारी टोळी गेले अनेक वर्षे कार्यरत आहे. स्वस्त जेवण, शरीराला माॅलिश करून देतो अशी पर्यटकांना भुरळ पाडतात व त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जातात,त्यांना विवस्त्र करून त्यांच्याकडील सर्व पैसे काढून घेतले जातात ,सोने चांदी काढून घेतली जाते व त्यानंतर मुलींना त्यांच्यावर उभे करून फोटो काढले जातात व त्यांना धमकी दिली जाते की तुमचे फोटो, व्हिडीओ आम्ही सर्वत्र व्हायरल करू मात्र काही जण लाजेखातर गप्प बसतात असाच हा प्रकार उघडकीस आला आहे. ज्या विकृतांनी ,नराधमाने छत्रपतींच्या नावाबद्दल अनुद्गगार काढले आहेत अशा समाजविघातक प्रवृत्तीला कठोर शासन व्हायला हवे असे मत श्री गावडे यांनी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page