मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा इशारा
सावंतवाडी ता.३१-:* नद्यातील गाळ काढणं, गाळ उपसा करणं महसूल यंत्रणेला जमलं नाही उलट नदितील काढलेले दगड संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाच्या हायवेवर काही ठिकाणी टाकण्यात आले याला जबाबदार कोण याचा सर्व गोष्टीचा महसूल प्रशासनाने अभ्यास करावा नंतरच पूरग्रस्तांना नोटिसा काढाव्यात असा सल्ला मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे तसेच नोटीसची आम्ही होळी करू असा इशारा त्यांनी प्रसिद्ध माध्यमाद्वारे दिला आहे.
