आमदार रवींद्र चव्हाण झाले आक्रमक : महिनाभरात रेंज न आल्यास भाजपकडून आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी ता.२७-:* चिपी विमानतळावर बीएसएनएल ची रेंज मिळत नसल्याने माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे आक्रमक होत त्यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर एका महिन्यात योग्य “तो” पाठपुरावा करून रेंजसाठी प्रयत्न करावा अन्यथा भाजप कडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना दिला. श्री चव्हाण यांनी आज अचानक चिपी विमानतळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते.
