बांबू बेटे भेल्या माड शेती याचे नुकसान
दोडामार्ग,दि.१४.-:* गेल्या काही दिवसांपासून दाखल झालेल्या जंगली हत्ती कळपाने पुन्हा एकदा आपला उच्छाद मांडला आहे त्यामुळे शेतकरी बांधव पुरता हैराण झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे त्यामुळे शेतकरी बांधव यांना शेती बागायती करणे जगणे कठीण झाले आहे.हेवाळे बांबर्डे गावात दाखल झालेल्या हत्तींनी आता मोर्ले पाळये गावात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात बांबू बेट,काजू,शेती भैल्या माडांना लक्ष केले आहे.
