न्यायालयीन कोठडीमुळे धडधाकड व्यक्तींची तब्येत बिघडल्यास कायद्याचा प्रश्न?

तर कोणीही कायदा हातात घेऊ शकतो : आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली खंत

सावंतवाडी ता.०४ -: न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर धडधाकड असणाऱ्या व्यक्तींची तब्येत काहीच क्षणात बिघडते. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात येते. आणि डॉक्टर देखील ती व्यक्ती आजारी असल्याचे सर्टिफिकेट देतात. असे होत असेल तर लोकांमधील भीती कमी होऊन, कोणीही कायदा हातात घेऊ शकतो. अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page