कोरोना कालावधीत पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजाविली

तहसीलदार राजाराम म्हात्रे : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथे पत्रकार दिन साजरा

*⚡सावंतवाडी ता.०६-:पत्रकारिता ही लोकशाहीची जनक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही आव्हानात्मक असूनही समाजाभिमुख आहे. कोरोना कालावधीत मीडियाने महत्वाची भूमिका बजाविल्याने आपण या महामारीपासून सावध राहू शकलो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत असलेली समाजाभिमुख व न्यायभिमुख पत्रकारिता आताच्या पत्रकारांनी पुढे न्यावी असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी माडखोल येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथील सावंत फार्म येथे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री म्हात्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम वाडकर, माजी अध्यक्ष हेमंत खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलन करून व बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्यात. केसरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकारांना वेगवेगळ्या समस्या जाणवत असतात. मात्र यावर मात करत जिल्ह्यातील पत्रकार काम करत आहे. येथील तळागाळातील समस्या व प्रश्न देखील पत्रकाराच्या माध्यमातून मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होतो. यावेळी विश्राम सावंत, प्रमोद सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम वाडकर यांनी केले. स्वागत अनंत जाधव, रुपेश हिराप, निलेश मोरजकर, गुरुनाथ कदम यांनी केले. सूत्रसंचालन कार्यवाह राकेश परब यांनी केले. आभार दिव्या वायंगणकर यांनी मानले.

यावेळी खजिनदार संदेश पाटील, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, विराज परब, शैलेश गवस, शैलेश मयेकर, मदन मुरकर, जयवंत मेस्त्री यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

You cannot copy content of this page