शालेय गटात मैथिली कदम, खुल्या गटात शिदलाळे प्रथम…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेतील शालेय गटातून शिवडाव हायस्कूलमधील मैथिली मिलिंद कदम तर खुल्या गटातून आंबोली येथील आर.एस. शिदलाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.

नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. शालेय गट (सातवी ते दहावीपर्यंत) व खुला गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. शालेय गटामध्ये ३० स्पर्धकांनी व खुल्या गटामध्ये २८ स्पर्धकांनी अशा एकूण ५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

शालेय गटातील निकाल पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय-आर्या सुनील पावले (एस.एम. हायस्कूल, कणकवली), तृतीय- श्रेया प्रवीण कदम (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली), उत्तेजनार्थ ईश्वरी गोविंद लाड (एस.एम. हायस्कूल कणकवली), वेदांत श्रीकांत वायंगणकर (भंडारी हायस्कूल मालवण).

खुला गटातील निकाल पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय-हेमंत मोतीराम पाटकर (रा. कणकवली), तृतीय-संजीव आत्माराम राऊत (रा. जामसंडे देवगड), उत्तेजनार्थ- चैत्राली सीताराम मांजरेकर (झाराप कुडाळ), अनुजा प्रवीण कदम (रा. कलमठ कणकवली). या स्पर्धेला परीक्षक म्हणून शालेय गटासाठी शरद हिंदळेकर व काशिनाथ कसालकर यांनी काम पाहिले. तर खुल्या गटासाठी परीक्षक म्हणून ए. ए. मुद्राळे, ऋतू महाडिक व शरद हिंदळेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सप्टेंबर महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. याची विजेत्या स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे. बक्षीस वितरण समारंभाचा दिवस फोनद्वारे कळविण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page