⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेतील शालेय गटातून शिवडाव हायस्कूलमधील मैथिली मिलिंद कदम तर खुल्या गटातून आंबोली येथील आर.एस. शिदलाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.
नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका विकास ग्रामोद्योग सोसायटी यांच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. शालेय गट (सातवी ते दहावीपर्यंत) व खुला गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. शालेय गटामध्ये ३० स्पर्धकांनी व खुल्या गटामध्ये २८ स्पर्धकांनी अशा एकूण ५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
शालेय गटातील निकाल पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय-आर्या सुनील पावले (एस.एम. हायस्कूल, कणकवली), तृतीय- श्रेया प्रवीण कदम (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली), उत्तेजनार्थ ईश्वरी गोविंद लाड (एस.एम. हायस्कूल कणकवली), वेदांत श्रीकांत वायंगणकर (भंडारी हायस्कूल मालवण).
खुला गटातील निकाल पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय-हेमंत मोतीराम पाटकर (रा. कणकवली), तृतीय-संजीव आत्माराम राऊत (रा. जामसंडे देवगड), उत्तेजनार्थ- चैत्राली सीताराम मांजरेकर (झाराप कुडाळ), अनुजा प्रवीण कदम (रा. कलमठ कणकवली). या स्पर्धेला परीक्षक म्हणून शालेय गटासाठी शरद हिंदळेकर व काशिनाथ कसालकर यांनी काम पाहिले. तर खुल्या गटासाठी परीक्षक म्हणून ए. ए. मुद्राळे, ऋतू महाडिक व शरद हिंदळेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सप्टेंबर महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. याची विजेत्या स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे. बक्षीस वितरण समारंभाचा दिवस फोनद्वारे कळविण्यात येणार आहे.