⚡वेंगुर्ला ता.२५-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या सहकार्याने ‘बाल संस्कारः काळाची गरज‘ यावर घेण्यात आलेल्या खुल्या निबंध लेखन स्पर्धेत घावनळे येथील संस्कृती वारंग यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
बाल मानसशास्त्र जपत लहानग्यांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे कार्य अविरतपणे अंगणवाडी ताई आणि सेविका करीत आहेत. अशा सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि सेविका यांच्यासाठी खुली निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आला. या स्पर्धेत एकूण ६९ महिलांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम-संस्कृती वारंग (घावनळे), द्वितीय- शुभलक्ष्मी पडते (वजराट), तृतीय – गौरी तुळसकर (तुळस), उत्तेजनार्थ-सायली मसुरकर (वायंगणी), विनिता कांबळी (आजगांव). स्पर्धेचे परिक्षण प्रा.डॉ.पी.आर.गावडे यांनी केले. सर्व विजेत्यांना लवकरच रोख पारितोषिक, चित्रफ्रेम, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
फोटो – स्पर्धेतील विजेत्या महिला.
अंगणवाडी ताई आणि सेविका निबंध लेखन स्पर्धेत संस्कृती वारंग प्रथम…!
