नवभारत साक्षरता अभियान गरजेचे…
कल्पना बोडके:सावंतवाडी तालुकास्तरीय उल्लास मेळावा.. सावंतवाडीआपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला अक्षराची ओळख असणे गरजेचे आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान गरजेचे आहे . प्रत्येकाला साक्षर करणे हे आपले कर्तव्य आहे . केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. यातून नव साक्षरांचाही आत्मविश्वास निश्चितच वाढेल. त्यांच्यातील न्यूनगंड कमी कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास…
