Headlines

“त्या” कनिष्ठ अभियंत्यांची तात्काळ बदली करा…

मनसेची अधिकाऱ्यांकडे मागणी;ती सर्विस लाईन तात्काळ दुरुस्त करा… सावंतवाडी ता.१८-:* न्हावेली चौकेकरवाडी येथे सर्विस लाईन तौक्ते वादळात तुटून पडली आहे. त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी आज वीज अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान मळगाव, निरवडे, न्हावेली, सोनूर्ली, तळवडे आदी भागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंतांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी,…

Read More

आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांना भाजप कडून वाहण्यात आली श्रद्धांजली…

सावंतवाडी ता.१८-:* आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे चार दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले होते.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भाजप कडून शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, व सर्व भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Read More

पावसाळ्यापूर्वी खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण करणार

भाजपातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ला तालुक्यातील मठ-बोवलेकरवाडी, आडेली-खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच हे खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. गेल्यावर्षी ह्या ठिकाणचे खड्डे बुजवीले होते, परंतु ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

Read More

ज्येष्ठ पत्रकार अण्णा देसाई यांचे निधन

वेंगुर्ला ता.१८-:* –जेष्ठ पत्रकार द.ना. तथा अण्णा देसाई यांचे ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.दै.गोमंतक, दै.रत्नागिरी टाईम्स, दै. सागर, दै सिंधुदुर्ग समाचार या वृत्तपत्रात काम केले. देसाई कुटुंबियांच्या ‘कोकण दिप प्रकाशन‘चे संपादक म्हणून काम करीत असताना परुळे भागात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उभारणीत त्यांचा मौल्यवान सहभाग होता. गाय वासरू काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असल्या पासून राष्ट्रीय…

Read More

प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ प्रदान

वेंगुर्ला ता.१८-:* पत्रकारितेसोबत बाल दशावतार चळवळीला चालना देऊन अनेक बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या वेंगुर्ल्यातील पत्रकार प्रथमेश उर्फ भैय्या गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ जाहिर झाला होता. हा पुरस्कार असून १४ मे रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या किरातच्या शताब्दी कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते श्री….

Read More

हलकर्णी व चंदगड आजरा तालुक्यातील तरुणांसाठी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन…

गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने आयोजन चंदगड ता.१८-:* गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने हलकर्णी व चंदगड आजरा तालुक्यातील तरुणांसाठी गुरुवार दिनांक १९ मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. तसेच येथून गोव्यात नेण्याची सोय देखील करण्यात येणार आहे. गोव्यातील नामांकित कंपन्यात हलकर्णी परिसरातील ग्रामीण…

Read More

नांदगाव येथील महामार्गाच्या प्रश्नांबाबत आमदार नितेश राणे अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी

सर्व्हिस रोडचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मिडल कटचा पर्याय;प्रांताधिकार्‍यांबरोबर झाली चर्चा कणकवली ता.१८-:* नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना मृत्यूचे आमंत्रण दिले आहे.यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांसमवेत भाजपा आम.नितेश राणे यांनी कणकवली प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेतली व नांदगाव तिठा येथील प्रलंबित कामांबाबत चर्चा केली. महामार्ग प्राधिकरण चे कनिष्ठ अभियंता श्री. जाधव यांच्याशी…

Read More

बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रातील २५ लाख अपहारप्रकरणी दोघे निर्दोष

कणकवली ता.१८-:* कणकवली ,देवगड येथील बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रात सुमारे 25 लाख रुपयांचा आर्थिक अपहार केल्याच्या आरोपातून बीएसएनएलचे तत्कालीन वरिष्ठ कार्यालयीन सहाय्यक निशीकांत अनंत सावंत (वाडा- देवगड) व बीएसएनएलचे अधिकृत वितरक उमेश केशव नेसवणकर (मिठमुंबरी- देवगड) यांची जिल्ह्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी निशीकांत सावंत यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत…

Read More

गोवा दौऱ्यावर असणाऱ्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची सावंतवाडी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ..

सावंतवाडी ता.१८-:* महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या गोवा दौऱ्यावर आले असून, यावेळी सावंतवाडी तालुका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, युवराज छत्रपती मालोजीराजे, फोमेंतो गृपचे आकाश टिमलो, शिवसेना सचिव श्री सुरज चव्हाण, श्री अमोल किर्तीकर, सुप्रदा फातर्पेकर, गोवा उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, युवासेना…

Read More

धम्म चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी युवापिढीची

बुद्धविचारांचे मार्गदर्शक सुशील मंचेकर; खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव वैभववाडी ता.१७-:* बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपणाला समानता प्राप्त झाली आहे. आणि त्यामुळेच सर्वजन सन्मानाने वावरत आहोत. बाबासाहेबांनी दिलेली धम्म चळवळ पुढे नेण्यासाठी आजच्या युवापिढी ची पूर्णपणे जबाबदारी आहे. याकरिता समाजात निरंतर जागृती केली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविले पाहिजे. बाबासाहेबांची नुसती जयंती साजरी न करता त्याबरोबरच…

Read More
You cannot copy content of this page