पदवीधर निवडणुकीत अर्चना घारेंनी बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय व शाळा क्रमांक पाच येथील महाविकास आघाडीच्या बुथना त्यांनी भेटी दिल्या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता रमेश कीर यांना पदवीधर मतदार निवडून देतील असा विश्वास सौ. अर्चना…

Read More

सेवा देत नसाल तर वीज विल वसुली कसली करताय ?

वीज ग्राहक संघटनेचा महावितरणला संतप्त सवाल:वीज ग्राहकांसाठी ४ जुलैला कुडाळमध्ये जनता दरबार.. ⚡कुडाळ ता.२६-: जिल्ह्यातील वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वीजपुरवठा खंडित होणे, संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक मिळणे, तक्रारीसाठी फोन केले तर ते फोन बंद असणे, अधिकाऱ्यांची मनमानी अशा तक्रारींचं प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग  जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने…

Read More

पदवीधर शिक्षकांचा मतदानाचा अधिकार डावलला…

रजा मंजूर असताना शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेसाठी सक्ती:राज्य प्राथमिक शिक्षक समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी.. ⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी जे मतदार आहेत अशा सर्वच पदवीधर मतदार असलेल्या शिक्षकांना सामान्य प्रशासन विभाग यांचे २३ जून २०२४ च्या आदेशाने विशेष नैमितिक रजा मंजूर केलेली आहे . मात्र शिक्षणाधिकारी (प्राथ)जि.प. सिंधुदुर्ग यांनी सायंकाळी…

Read More

फरा प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

महेश सरनाईक, समीर ठाकूर,केशव जाधव, दीपक सामंत यांच्यासह १६ जणांचा होणार गौरव.. ⚡दोडामार्ग ता.२६-: तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १३ व्या वर्षातील पुरस्कार आज (ता. २६) जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग बाजारपेठेतील वसंत संस्कृतिक ( परमेकर) सभागृहात…

Read More

राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा…

अंनत भाटे: नट वाचनालयाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी… बांदा/प्रतिनिधीराजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते. त्यांनी मुलांच्या शिक्षणासह अनेक योजना शेतकरी व लोकांसाठी राबविल्या. यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. अशा लोकराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.येथील नट वाचनालयच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू…

Read More

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्त्यावर झाड पडून नुकसान…

⚡कुडाळ ता.२६-: पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्त्यावर बुधवारी दुपारी ११ च्या सुमारास झाड पडून वाहतूक कोंडी झाली. या घटनेत सहा मोटरसायकल झाडाखाली सापडल्या. यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाडाची मोठी फांदी उसाच्या गाड्यावर पडून मोठे नुकसान झाले.यावेळी सदर झाड हटविण्यासाठी सरपंच अजय आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर,…

Read More

निरंजन डावखरे एकतर्फी निवडून येणार…

राजन तेली:पदवीधर निवडणुकीसाठी कणकवलीत बजावला मतदानाचा हक्क.. ⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे एकतर्फी निवडून येणार असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी यांनी…

Read More

हडी येथील सुर्वे कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन…

⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यातील हडी जठारवाडी येथील शिवाजी लक्ष्मण सुर्वे वय ३० यांचा अपघात होऊन दुःखद निधन झाले. त्यामुळे सुर्वे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुर्वे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष आमरे, हडी शाखाप्रमुख मयूर करंगुटकर, उपशाखाप्रमुख महेश सुर्वे, ग्रा. प….

Read More

नेमळ्यात घरावर झाड कोसळले…

सुदैवाने जीवितहानी टळली:घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२६-: तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे. याच वादळी वाऱ्यामुळे नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे घरालगतचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने…

Read More

झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते…

उमेश तोरस्कर:जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे वृक्षारोपण.. ⚡सावंतवाडी ता.२६-: झाडे लावा आणि झाडे जगवा झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात झाडामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहते त्यामुळे झाडे लावा आणि त्यांना जगवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले…

Read More
You cannot copy content of this page