पळसंबची सुकन्या श्रृती परब राज्यस्तरीय स्पर्धेत चमक…

किकबॉक्सिंग चॅम्पियन्सशिप स्पर्धेत मिळविले सुवर्ण पदक.. ⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील पळसंब गावठाण येथील मुंबईस्थित रहिवाशी कु. श्रुती संदिप परब हिने १४ जुलै रोजी झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि पळसंब गावचे नाव उज्वल केले. तिची महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे म्हापसा, गोवा येथे २४ जुलै ते २८ जुलै २०२४पर्यंत आयोजित ‘वाको इंडिया…

Read More

मालवणात ऑफलाईन पद्धतीने रेशन धान्य वितरण करण्यात यावे…

श्रीकृष्ण तळवडेकर:काँग्रेसची तहसीलदा्रांकडे मागणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहर व तालुक्यातील रेशन धान्य दुकानांवरील ई पॉस मशीन द्वारे होणाऱ्या धान्य वितरणाच्या ऑनलाइन पद्धतीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे ऑफलाईन धान्य देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर व राष्ट्रीय काँग्रेस मालवणतर्फे मालवणच्या तहसीलदार वर्षा…

Read More

तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित नाही…

मिलिंद सावंत:लवकरात लवकर बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करा;अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलन.. ⚡बांदा ता.२९-: महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अ‌द्याप पर्यंत सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झालेली आढळून येत नाही. अशा परिस्थितीत सध्या प्रशासनाच्या विविध योजनांसाठी सामान्य नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत लागणारे…

Read More

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.२९-: रोटरी क्लब ऑफ बांदा, सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ७० दात्यांनी रक्तदान केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यासाठीच बांदा येथे रक्तदान शिबिर आयोजित…

Read More

स्वतंत्र वायरमनच्या मागणीसाठी निगुडे ग्रामस्थांनी बांदा महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला…

महावितरणने गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती केल्या नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन घेतल मागे… ⚡बांदा ता.२९:- निगुडे गावाला स्वतंत्र वायरमनच्या मागणीसाठी निगुडे ग्रामस्थांनी बांदा महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला आहे. गेले आठ दिवस लाईटचा खेळखंडोबा सुरू आहे. गावासाठी स्वतंत्र वायरमन देत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर पडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव…

Read More

जिल्ह्याबाहेरील तलाठी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून परवान्यांचे वाटप..

आमदार वैभव नाईक यांचा तत्कालीन, विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप:परवाने देताना आर्थिक व्यवहार झाल्याचा व्यक्त केला संशय… कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करत संगनमताने सिंधुदुर्ग जिल्हा बाहेरील लोकांना शस्त्र परवाने दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८०० हून अधिक वारस हक्क परवान्याकरिता शेतकरी मागणी करत आहेत. ४०० हून अधिक शस्त्रे ही पोलीस स्टेशन वर जमा…

Read More

नांदगाव विभागातील वीज समस्यांबाबत कार्यकारी अभियंतांना ग्रामस्थांचा घेराव…

वीज समस्या ३० ऑगस्ट पूर्वी सोडवण्याच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे.. ⚡कणकवली ता.२९-: नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत येणा-या १२ गावांमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत नळयोजना वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. वीज मीटर व वीजेची उपकरणे उच्चदाबामुळे जळून खाक होत आहेत. मान्सुन पूर्व झाडी कटींग…

Read More

ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित…

श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.२९-: श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार यांना ग्रामसेवक यांनी सही बंद केली आहे. त्यामुळे सर्व कामगार यांचे लाभ थांबलेले आहेत. कामगार वर्ग…

Read More

गेळे प्रश्न सोडवलाय,मी नारळावर हात ठेवून सांगतो…

मंत्री दिपक केसरकर:तर अनेल लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीनी खरेदी करत सुटलेत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता. महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत वहीवाट नाही अशा जमीनींच कधीही वाटप केलं नाही. या जमीनीच वाटप करण्यासाठी मी प्रयत्न केलेत. मी कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात नारळ ठेवा अन् मी अडवल्याच सांगा….

Read More

गेळे वासियांनी गाव बंदी करून केसरकरांना त्यांची जागा दाखवली…

राजन तेली: माझ्यावर हकालपट्टीचे कारवाई करणार होता त्याच काय झाल..? ⚡सावंतवाडी ता.२९-: केसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाहि किंवा बोलच्चन गिरी करत नाही, आज गेळे सारख्या गावात ग्रामस्थ प्रसंगी तुम्हाला गाव बंदी करतात यावरूनच तुमच काम किती चांगल आहे हे गेळे वासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन…

Read More
You cannot copy content of this page