समाजसेवक गुरू कल्याणकर यांच्या शिष्टाई नंतर बंद पडलेले घारपी रस्त्याचे काम पुन्हा सुरू…!
⚡बांदा ता.०३-: स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता घारपी मुख्य रस्त्याचे काम अचानकपणे सुरु करण्यात आल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत काम बंद पाडले. याबाबत ग्रामस्थांनी येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्याशी संपर्क साधत कैफियत मांडली. कल्याणकर यांनी ग्रामस्थ व ठेकेदार यांची गावात संयुक्त बैठक घेत यशस्वी शिष्टाई करत यावर तोडगा…
