Global Maharashtra Breaking News

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा कळसुली येथे भव्य शुभारंभ…

⚡कणकवली ता.१०-: विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री देव भोगनाथ मंदिर व श्री देव जैन गिरोबा मंदिर कळसुली येथे नारळ देवून करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती फार उल्लेखनीय होती. असंख्य कार्यकर्ते या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.यावेळी सरपंच सचिन पारधीये, राष्ट्रवादी युवक…

Read More

गोठणे-गावठणवाडी येथील ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

मालवण (प्रतिनिधी) कुडाळ-मालवणचे आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील गोठणे-गावठाणवाडी येथील ग्रामस्थांनी व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गोठणे गावाचा विकास आम. वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर…

Read More

रेवतळे येथे आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

मालवण (प्रतिनिधी) मालवणातील रेवतळे भागात चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला साकडे घालून महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आम. वैभव नाईक यांना रेवतळे भागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, माजी नगरसेविका शीला गिरकर, शहरप्रमुख बाबी…

Read More

कुडाळ तहसील कार्यालयात ११ आणि १२ रोजी नागरिकांना प्रवेश बंदी…

कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयात दिनांक ११ आणि १२ नोव्हेंबर दिवशी सकाळी ७ वाजल्यापासन सायंकाळपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. या कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच उक्त कामकाजासाठी नियुक्त…

Read More

आकेरीतील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. .आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित…

Read More

लोकसभेच्या निवडणुकीत महेंद्र सांगेलकर यांनी घेतलेली मेहनत ही काँग्रेसला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारी ठरेल…

विनायक राऊत: आजच्या काँग्रेसच्या बैठकीला मिळालेला प्रतिसाद राजन तेली यांच्या विजयाची नांदी ठरेल.. ⚡सावंतवाडी ता.१०-: काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेली मेहनत ही येणाऱ्या काळात काँग्रेसला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारी ठरेल असे गैरउद्गार माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी काँग्रेसच्या बैठकीत काढले दरम्यान महेंद्र सांगेलकर हे काँग्रेसचे तळमळीचे कार्यकर्ते आज त्यांनी भरवलेली…

Read More

अमोल सावंत-मोर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡बांदा ता.१०-: बांदा आंगडीवाडी येथील अमोल पांडुरंग सावंत-मोर्ये (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने काल (शनिवारी) दुपारी दुःखद निधन झाले. ते येथील श्री देव बांदेश्वर मंदिरात नित्य सेवेसाठी कार्यरत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.फोटो :-पासपोर्ट.

Read More

कळसुळीतील उ.बा.ठा सेनेचे कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात…

कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील उ.बा. ठा. सेना युवा कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे उ.बा. ठा. सेनाला कळसुली गावामध्ये धक्का बसला आहे. उ.बा.ठा. सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत विठ्ठल चव्हाण यांनी उ.बा.ठा. सेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र केवळ आश्वासने देणे व फसवणे या पलीकडे…

Read More

सी वर्ल्ड, रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवा…

प्रमोद जठार:सहाही आमदार महायुतीचेच निवडून येणार.. कणकवली : ज्याला रिफायनरी नको, समृद्धी महामार्ग नको, सी वर्ल्ड प्रकल्प नको, कुठलाच विकास प्रकल्‍प नको अशा उद्धव ठाकरे यांना आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्‍यामुळे चिपळूण ते सावंतवाडीपर्यंतच्या सहाही मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येणार असा विश्‍वास माजी आमदार आणि भाजप संघटक समन्वयक प्रमोद जठार यांनी येथे…

Read More

बेईमानी कृतघ्नता ज्यांनी केली”त्या” गद्दारांना उद्धव ठाकरे कधीच घेणार नाही…

विनायक राऊत:भाजपवाल्यानी राजकारणाचा बाजार केलाय, खरेदी विक्रीचा भाव जोरात असल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.१०-: काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची विचारसरणी हे भाजपवाले कधी काढू शकणार नाहीत यांची खात्री झाल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर बेईमानी कृतघ्नता ज्यांनी केली त्या गद्दारांना पुन्हा सोबत घेणार नाही असे स्पष्ट संकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष…

Read More
You cannot copy content of this page