Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७हजार ७८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

रस्त्यावर झाडी वाढली, खड्डे सुद्धा पडलेत

प्रशासनाचे दुर्लक्ष:पंचायत समिती सभेत नाराजी *⚡सावंतवाडी ता.२७-:* अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना देखील तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार विज पुरवठा खंडित होत आहे. रस्त्यांवर ठीक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. याबाबत वारंवार मागणी करून देखील महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने, याबाबत पंचायत समितीच्या मासिक…

Read More

असरोंडी दाडसखलवाडी येथील शेतकरी दामोदर सावंत यांचे निधन

*⚡मालवण ता.२७-:* मालवण तालुक्यातील असरोंडी दाडसखलवाडी येथील ज्येष्ठ शेतकरी दामोदर पांडुरंग सावंत (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे, एक मुलगी, एक भाऊ, बहीण, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. असरोंडी येथील विजय व किशोर सावंत, मुंबई येथील विलास व भालचंद्र सावंत आणि मालवण मधील वाहतूक व्यावसायिक राजेंद्र सावंत यांचे ते…

Read More

ऍक्शनला रिऍक्शन होणार:

ना. उदय सामंत;आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेतला आढावा कणकवली 27 ऑगस्ट (प्रतिनिधी)- ऍक्शन चांगली असेल तर रिऍक्शन चांगली असणार पण ऍक्शनच वाईट असेल तर रिऍक्शन हि वाईट होणार असे सूचक वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात केले आहे. तसेच जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने या…

Read More

भंडारी हायस्कुलच्या क्रिकेट नेट मधून ५ खेळाडूंची जिल्हा संघासाठी निवड

*⚡मालवण ता.२७-:* धुळे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे होणाऱ्या राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये १६ वर्षाखालील मुलांच्या संघासाठी मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या क्रिकेट नेट मधून आर्यन सारंग, हितेश मालंडकर व शौनक कांदळगावकर यांची तर १९ वर्षाखालील संघासाठी तन्वी सरकारे व अनुष्का आंबेरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी…

Read More

करपा रोगामुळे भातपीक वाया जाण्याची स्थिती तात्काळ पंचनामे करावे;

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची मागणी *⚡देवगड ता.२७-:* देवगड तालुक्याचा बहुतांशी कातळ भाग असल्याने चार दिवस पाऊस न झाल्यास शेती सुकून पिवळी पडते. तालुक्यात पावसामुळे सध्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे. कडक ऊन असल्याने करपा रोगामुळे उत्पादन मिळणारे भातपीक वाया जाण्याची स्थिती असल्याने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी…

Read More

गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तातडीने डागडुजी करून वीज पुरवठा सुरळीत करा

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी वीज वितरणचे वेधले लक्ष देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील नागरिकांना विजेची मोठी समस्या जाणवत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागातील वीज वारंवार जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गणेशोत्सव सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे….

Read More

एसटी बस स्थानकासमोर मिडलकटचे काम सुरू

संदेश पारकर यांच्या इशार्‍यानंतर हायवे प्राधिकरणची उपाययोजना *⚡कणकवली ता.२७-:* कणकवली एसटी बसस्थानकासमोर हायवे उड्डाणपूलाखालून गाड्या बाहेर जाण्यासाठी बॅरीकेट्स काढून मिडलकट ठेवण्यासह इतर समस्या तातडीने सोडविण्याविषयी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. समस्या न सोडवल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण व हायवे चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने तातडीने…

Read More

व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणताही त्याग करेन-माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ

*⚡वेंगुर्ला ता.२७-:* मला कोणतेही राजकारण करायचे नसून व्यापा-यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. गेली अनेक वर्षे व्यापार करीत असलेले गाळे त्यांना मिळाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे अशी माहिती देताना माझ्याबाबीत नगराध्यक्ष यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खोटे व संतापजनक असल्याचेही वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी म्हटले…

Read More

केणीवाड्यातील स्ट्रीट लाइट अखेर सुरू

सरपंचांनी दिलेला शब्द पाळला : भाजपचे काका परब यांनी व्यक्त केले समाधान *⚡बांदा दि.२७-:* तौक्ते चक्रिवादळानंतर चार महिने पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट बंदावस्थेत होती. भाजपा पदाधिऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाडलोस ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत स्ट्रीट लाईट सुरू केली. सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने भाजप सावंतवाडी युवामोर्चा सरचिटणीस विनायक ऊर्फ काका यांनी…

Read More
You cannot copy content of this page