नारळ उत्पादनासाठी पंचसूत्री अंमलात आणा-डॉ.दिलीप नागवेकर
वेंगुर्ला ता.२७-:* नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाचे उत्पादन कसे वाढवता येईल या दृष्टीने नारळाच्या जाती, नारळाच्या दोन झाडांमधील अंतर, खते व पाणी व्यवस्थापन, नारळाच्या बागेमध्ये आंतरपिक लागवड, पीक संरक्षण ही पंचसूत्री अंमलात आणणे आवश्यक आहे. रासायनिक खताबरोबर शेणखत, कंपोस्ट खत तसेच आवश्यक तेवढेच पाणी देणे गरजेचे आहे. नारळाच्या बागेमध्ये विक्रीयोग्य अशी भाजीपाला, अननस, केळी वगैरे…
