Global Maharashtra Breaking News

मळेवाड जकात नाका ते आजगाव सावरदेव रस्त्यावर खड्डेच खड्डे…

विभागाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त:बळी गेल्यावरच जाग येणार का..?” ग्रामस्थांचा सवाल.. सावंतवाडी : मळेवाड ते आजगाव सावरदेव व मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे मागील काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण खराब होऊन रस्त्यावर खड्डे पडले. मात्र हे खड्डे अजूनही बुजवले नाहीत. त्यामुळे येथे वाहने घसरून अपघात घडत आहेत. वारंवार अपघात…

Read More

चौकुळचा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता…

⚡आंबोली,ता.९-: चौकुळ बोरी धनगरवाडी येथील दत्तू वरक वय २३, हा युवक आठ दिवसापासून पंढरपूर येथून बेपत्ता आहे. 2 डिसेम्बर ला गावी चौकुळ येथे जातो असे सांगून आला तो पोहचलाच नाही.तो पंढरपूर लिंकरोड येथे एका रेस्टॉरंट मध्ये कामाला होता.आठ दिवसापासून तो बेपत्ता आहे.उंची पाच फुट सहा इंच,रंग काळा सावळा,अंगात लाल रंगाचे टी शर्ट आणि काळी पॅन्ट…

Read More

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट…

⚡नागपूर दि.०९-: कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी कोळंबी सोलणाऱ्या महिलांसाठी विशेष हातमोजे (ग्लोव्हज) उपलब्ध करून देण्याची घोषणा केली, तर मासळी बाजारातील कचरा व दुर्गंधी दूर करण्यासाठी विभागामार्फत ठोस उपाययोजना सुरू…

Read More

नम्रता, प्रेम असेल तर कुणालाही आपलेसे करता येते…

डॉ. गिरीष ओक:बॅ. नाथ पै सेंट्रल स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.. कुडाळ : अंगी नम्रता, प्रेम असेल तर या जगात कोणालाही आपलेसे करता येते. राहतो तो देश, करतो ते काम आणि संपर्कात येईल त्या माणसावर प्रेम केल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आपल्यातील कलागुणावर श्रद्धा विश्वास ठेवून प्रेम करा. म्हणजे त्यातून तुमच्यातील उद्याचा कलाकार प्रकाशमान होईल. असे…

Read More

वैदेही पाटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘वैदेही पुरस्कार’ मंजुळा शिंत्रेना जाहीर…

⚡मालवण ता.०९-:वैदेही पाटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वैदेही पुरस्कार यावेळी ‘अर्ज’ संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मंजुळा शिंत्र यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण (ना. ग. गोरे सभागृह) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अन्याय रहित जिंदगी…

Read More

कोळंब रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; ग्रामस्थ आक्रमक…

खड्डे बुजविले न गेल्यास रास्ता रोकोचा इशारा.. ⚡मालवण ता.०९-:मालवण- आचरा सागरी महामार्गावरील कोळंब गावातील रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली असून अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला जाब विचारला. ग्रामस्थांनी…

Read More

नवज्योत गावडे वेंगुर्ला एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आगारातील समस्या तसेच प्रवासी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या समस्यांबाबत कार्यवाही करणार असल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले. याप्रसंगी सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाचे वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपाध्यक्ष भाऊ सावळ, मिलिंद मयेकर, वैभव मांजरेकर, नांदोसकर, श्री.मचे,…

Read More

सातवा वेतन आयोग ; सिंधुदुर्गातील शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्याच्या आशा पल्लवित…

कोल्हापूर सर्किट बेंचच्या एकाच वेळी चार सचिवांना करणे दाखवा नोटीसा.. कुडाळ : सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करताना झालेली त्रुटी निवारण करण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी ऍड बालाजी शिंदे यांचेमार्फत कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची १ डिसेंबर रोजी कोल्हापूर सर्किट बेच येथे सुनावणी होऊन मा. न्यायालयाने शिक्षण विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास…

Read More

कुडाळात माकडांना पकडण्यासाठी वन विभाग ऍक्शन मोड वर…

नुकसान भरपाई पंचनामे करण्यास सुरुवात:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०९-: शहरात माकडांच्या होत असलेल्या उपद्रवाबाबत वनविभाग ऍक्शन मोड वर आला आहे. आज शहरात काही ठिकाणी माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. तसेच माकडांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा वन विभागामार्फ़त करण्यात आला. यासाठी कुडाळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता.कुडाळ…

Read More

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय…

१३ वर्षांच्या लढ्यानंतर ठाणे औद्योगिक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय.. ⚡कणकवली ता.०९-: महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या १३ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर न्याय मिळाला असून ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता दिली आहे. वेतनश्रेणी, पदोन्नती, भत्ते आणि सेवेत लागू असलेले सर्व लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत….

Read More
You cannot copy content of this page