Headlines

Global Maharashtra Breaking News

सुशांत खिल्लारे खून प्रकरणी अन्य तिघे ताब्यात

कराड येथून घेतले ताब्यात सावंतवाडी ता.०५ : वीट व्यवसायासाठी कामगार पुरवतो असे सांगून घेतलेले तीन लाख रुपये परत न केल्याच्या रागातून मारहाण करताना मृत्यू झालेल्या सुशांत खिल्लारे खून प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी कराड येथून अन्य तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या. अभय पाटील (३५), प्रवीण बळीवंत (२५) व राहूल माने (२३, सर्व रा. कराड) अशी या तिघांची नावे…

Read More

सालईवाडा येथील घरातून ३८ हजाराची चोरी

मोबाईल, सोन्याची चेन, व्यायामाच्या साहित्याचा समावेश ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील सालईवाडा परिसरात एका घरातून मोबाईल, सोन्याची चेन व व्यायाम करण्याचे लोखंडी डंबेल्स मिळून एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर साजिद ऊर्फ मुन्ना इसाक शेख (रा. बिरोडकर टेम्ब ) याला ताब्यात घेत त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

सालईवाडा येथील घरातून ३८ हजाराची चोरी

मोबाईल, सोन्याची चेन, व्यायामाच्या साहित्याचा समावेश ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील सालईवाडा परिसरात एका घरातून मोबाईल, सोन्याची चेन व व्यायाम करण्याचे लोखंडी डंबेल्स मिळून एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर साजिद ऊर्फ मुन्ना इसाक शेख (रा. बिरोडकर टेम्ब ) याला ताब्यात घेत त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

संत शिरोमणी रविदास महाराज यांचे आचार व विचार प्रत्येकाने आत्मसात करावे:आम. वैभव नाईक

⚡कणकवली ता.०५-: प. पू. संत शिरोमणी रविदास महाराज यांचे आचार व विचार सर्वसमावेशक असून ते प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. सिंधुदुर्गातील चर्मकार समाज बांधवांचे ओरोस येथे समाजभवन उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आपण १० लाखांची मदत दिली असून यापुढेही सर्व प्रकारचे माझ्याकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज बांधवांच्यावतीने…

Read More

कणकवलीतील तो बंद एअरटेल टॉवर अखेर सुरू

⚡कणकवली ता.०५-: कणकवलीतील गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेला एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर यांनी कणकवली बांधकरवाडी दत्त मंदिराजवळ तातडीने ट्रक टॉवर उभारण्याची केलेली मागणी पूर्णत्वास गेल्यानंतर प्रत्यक्षात हा ट्रक टॉवर आज रविवारी संध्याकाळी पाच…

Read More

रामभाऊ म्हाळगी सभागृह येथे प्रशिक्षणासाठी सरपंच झाले रवाना

⚡कणकवली ता.०५-: आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली-देवगड- वैभववाडी सरपंच यांचे प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी सभागृह,उत्तन, भाईंदर(पश्चिम) जिल्हा – ठाणे येथे आयोजित केले आहे,त्यासाठी कणकवली येथून सरपंच यांना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कणकवली खरेद-विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत,भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे,सुशील…

Read More

रुग्णवाहिका फक्त शिवसैनिकांसाठी नाही तर सर्वांसाठी

खा. अरविंद सावंत;नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्गात आरोग्य आणि शिक्षण यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जिल्हयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून दिले आहे. नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागातील गरज लक्षात घेऊन हि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हि रुग्णवाहिका फक्त शिवसैनिकांसाठी नाही तर…

Read More

बांदा देऊळवाडीत भीषण आग…

पाच एकर क्षेत्रातील काजू बागायती खाक ;लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान ⚡बांदा ता..०५-: बांदा शहरात देऊळवाडी भरडाला आज दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे ५ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, निलेश मोरजकर यांच्यासह…

Read More

मडुरा-भुताचे टेंब परिसरातील वायंगणी भातशेती गव्यांकडून फस्त

⚡बांदा ता.०५-: मडुरा – परबवाडी येथील भुताचे टेंब परिसरातील वायंगणी भातशेतीसह रब्बी पिकांचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. शेतकरी बाबली चिंतू परब व ज्ञानेश पांडुरंग परब यांच्या सुमारे एकरभर क्षेत्रातील वायंगणी शेती गव्यांनी फस्त केली. तसेच बाबली परब यांच्या मिरची रोपांचीही नासधूस केली. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा. नुकसानीचे पंचनामे करुन संबंधित शेतकर्‍यांना भरपाई देण्याची…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव :विजय गांवकर

⚡कणकवली ता.०५-: जिल्ह्यातील, तालुक्यातील मुल शिकावीत, मोठी व्हावी आणि ती आपल्या ध्येय धोरणांपर्यंत पोहोचावी. यासाठी नेहमी धडाडीचे प्रयत्न करत असलेले जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व त्यांच्या पत्नी जि.प.सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्ष संजना सावंत तसेच सावंत कुटूंबीय हे नेहमीच राजकारणापलीकडे समाजाला, शाळकरी मुलांना तसेच इतर गरजुना काहीतरी देण्याचे प्रयत्न करत असतात. २०१८ पासून…

Read More
You cannot copy content of this page