Headlines

विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेच्या १६ वर्षाखालील संघात विश्वनाथ रेगे यांची निवड

रेगे एम क्रिकेट अकादमीचा खेळाडू;पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना बांदा/प्रतिनिधीविजय मर्चंट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या १६ वर्षांखालील खेळाडूंच्या शिबिरासाठी सावंतवाडीतील विश्वनाथ उर्फ पप्पू रेगे या खेळाडूची निवड करण्यात आली असून तो शनिवारी या शिबिरासाठी पुणे येथे रवाना झाला.विश्वनाथ हा सावंतवाडीतील एम क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू आहे.महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन ने घेतलेल्या १६ वर्षाखालील खेळाडूंच्या इन्व्हिटेशन लीगमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

आचरा येथे १५ नोव्हेंबरला वीज ग्राहक मेळावा.

⚡मालवण ता.१३-: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (सिंधुदुर्ग मंडल) उपविभाग-आचरा आयोजित तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग व व्यापारी संघटना आचरा यांच्या सहकार्याने प्रथमच मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी ‘लौकिक सांस्कृतिक भवन’ (हाँटेल सीराँक शेजारी) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वा. पर्यंत शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक व घरगुती ग्राहकांसाठी आचरा येथे प्रथमच “विज ग्राहक मेळाव्याचे”…

Read More

चौके येथील भराडी देवीचा १६ रोजी जत्रोत्सव

⚡मालवण ता.१३-: चौके गावची ग्रामदेवता श्री देवी भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री भराडी देवीची पूजा नतंर श्री भराडी देवीची मानाची योटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. यावेळी नवस फेडणे नवस बोलणे त्यानंतर रात्रौ ११.३० वाजता वाजत गाजत श्री…

Read More

कासार्डे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यक्तिमत्व विकास शिबिर

⚡कणकवली ता.१३-: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 97 वर्षे पूर्ण होत आहेत. संघाचे विचार समाजात दृढ करण्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत संघाच्या व्यक्तिमत्व शिबीर (प्राथमिक वर्गासाठी) ठरवला जातो. पूर्वी असा वर्ग नागपूर, मुंबई, पुणे मोठ्या शहरात होत असे. यावर्षी हा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व विकास शिबिर प्रथमच कासार्डे येथे संपन्न झाला.  गेल्या वर्षी बांदा – पानवळ येथे असा वर्ग…

Read More

तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळावा

⚡कणकवली ता.१३-:तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 25 व 26 नोव्हेंबरला तळेरे येथे होणार आहेत, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेली 25 वर्षे स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने विविध…

Read More

वेंगुर्लेत आढळल्या समुद्री गरुड, पायाची हरोळी, पिचू पोपट यासह ९४ प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती

पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित पक्षी निरीक्षण उपक्रमात नोंदी ⚡वेंगुर्ले ता.१३-: वेंगुर्ले येथे पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले शहरातील पक्षी गणनेचा उपक्रम घेण्यात आला. या पक्षी निरीक्षणात वेंगुर्ले शहरातील दिपगृह परिसर (निमुसगा), तांबळेश्वर मंदीर परिसर आणि होळकर देवस्थान परिसर या भागातील पक्षी प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण ९४ प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळल्या. त्यांच्या नोंदी व छायाचित्रण करण्यात…

Read More

कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची 15 रोजी मासिक सभा

⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा मंगळवार 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे. सभेत पेन्शन संबंधी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.असे संस्थेचे अध्यक्ष,सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी कळविले आहे.तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी त्यांच्या प्रलंबित क्लेम अथवा मागण्या बाबतीत लिखीत…

Read More

“स्मरण साखळी” पुस्तकाचे १५ रोजी प्रकाशन

शिवसेना विस्तार इतिहासाची या पुस्तकात मांडणी;जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांची माहिती सावंतवाडी ता.१३-: कोकणात शिवसेना कशाप्रकारे उभी राहिली, शिवसेनेत मी कसा संघर्ष केला, गावा गावात कशा प्रकारे शिवसेना वाढत गेली, याची माहिती देणारे ” स्मरण साखळी” नावाच्या पुस्तकाचे १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशन होत असल्याची माहिती ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर यांनी दिली आहे. सावंतवाडी पत्रकार संघ…

Read More

दोडामार्ग शहराच्या विकासासाठी भाजप पक्ष, नेते कधी कमी पडणार नाहीत

भाजप युवा नेते विशाल परब यांचा विश्वास;नगराध्यक्ष चेतन चव्हाण आयोजित दीपावली शो टाईमचे परब यांच्याहस्ते उद्घाटन ⚡दोडामार्ग ता.१३-: दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आणि निधी देण्यासाठी माझे नेते, माझा पक्ष आणि मी कधीही कमी पडणार नाही.भविष्यात या भागासाठी कोट्यावधीचा निधी येईल आणि दोडामार्ग हे राज्यातील नंबर वन शहर बनेल. यात कोणतीही शंका नाही.यासाठी दोडामार्ग वासियांनी आज जशी…

Read More

कष्टकऱ्यांचे जगणे अन् जीवनाचे तत्त्वज्ञान सांगते तेच खरे साहित्य

कॉ. संपत देसाई;सावंतवाडीत समाज साहित्य संमेलन संपन्न ⚡सावंतवाडी ता.१३-: सध्या साहित्याची परिभाषा बदलत आहे. असे असतानाही शेकडो वर्षांपूर्वी संत जनाबाई, संत सोयराबाई, संत तुकोबाराय, महात्मा बसवेश्वर अशा अनेक महनीय व्यक्तींनी आपल्या लेखन साहित्यातून मानवतावाद सांगितला. त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचे जगणे रेखाटले आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय!’ अशी तत्त्वप्रणाली घेऊन निर्माण झालेले हे साहित्य जगण्याचे तत्त्वज्ञान…

Read More
You cannot copy content of this page