Headlines

मालवणात मनसेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

⚡मालवण ता.२८-: मालवण मनसेच्या वतीने मालवण येथील कुडाळकर हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मनसे मालवण संपर्क प्रमुख राजू साटम यांच्या सहकार्याने हे वाटप करण्यात आले, अशी माहिती मनसेचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिली. यावेळी विशाल ओटवणेकर यांच्यासह युवा कार्यकर्ते व उद्योजक प्रितम गावडे, रामनाथ पराडकर, मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, प्रशांत…

Read More

ग्रामस्थांनी नोंदवलेल्या हरकतीनंतर आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडत मध्ये झाला बदल

⚡मालवण ता.२८-: आचरा ग्रामपंचायतिच्या सरपंचांसहित सदस्यांचा कार्यकाल २० एप्रिल रोजी संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला असताना आचरा ग्रामपंचायतीच्या जून महिन्यात झालेल्या विशेष ग्रामसभेत आगामी काळात होणाऱ्या आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत प्रभाग रचनेनुसार जाहीर करण्यात आली होती. मात्र या आरक्षण सोडतीला काही ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. या हरकतीनंतर आरक्षणच्या सोडतीत बदल करण्यात आला…

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता…

वर्दे फातरीचे गाळू रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर. ⚡सावंतवाडी ता.२८-: केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या जनसंपर्क अभिनयानानंतर निलेश राणे यांनी विविध स्थरावरून कुडाळ व मालवण साठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू…

Read More

मतिमंद मुलांना खाऊ, छत्रीचे वाटप.

शैलेश परब, श्रुतिका दळवी यांचा पुढाकार सावंतवाडी ता.२८-:सावंतवाडी येथे मतिमंद मुलांना शैलेश परब यांच्या माध्यमातून खाऊ वाटप आणि श्रुतिका दळवी यांच्या माध्यमातून छत्री वाटप करण्यात आले. यावेळी शहर संघटक श्रुतिका दळवी, तालुका संघटक भारती कासार, युवासेना शहर संघटक प्रिया नेनिवळ, प्रगती बामणे, संगीता पेडणेकर, सुलभा टोपले, कल्पना नाटेकर, नंदा सावंत, रुपा मुद्राळे आदी उपस्थित होते.

Read More

देवगड व वेंगुर्ला बस स्थानकाचे रूपडे पालटणार

नुतनीकरणाकरिता दोन कोटीची प्रशासकीय मंजुरी ⚡कणकवली ता.२८-: राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील देवगड व वेंगुर्ला बसस्थानक नुतनीकरणाकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली असून लवकरच या दोन्ही बसस्थानकांस शासकीय निधीमधून नुतनीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग विभागातून देवगड व वेंगुर्ला या बसस्थानकांची…

Read More

जनतेची दिशाभूल राऊळ यांनी थांबवावी…

राजन पोकळे ; कुठल्याही शाळेतून पुस्तकांची तक्रार नाही ⚡सावंतवाडी ता.२८- : समग्र शिक्षा अंतर्गत शासन अनुदानित व जिल्हा परिषद शाळांना इ. 1 ली ते 8वी च्या विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वितरीत केली जातात. या पुस्तकांची मागणी त्या-त्या शाळांचे मुख्याध्यापक ऑनलाईन पद्धतीने मागणी करतात. त्यांच्या मागणीनुसार पाठ्यपुस्तके शाळांना पुरविली जातात मात्र नविन अ‍ॅडमिशनमुळे काही…

Read More

पाच हजार कोटींचा व्यवसाय टप्पा जिल्हा बँकेने केला पार

कोकणात अव्वल:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ओरोस ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 27 जुलै 2023 रोजी व्यवसायाचा टप्पा 5000 कोटींवर नेला आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कोकण विभागात अव्वल ठरली आहे. तर गत आर्थिक वर्षात ठेवींचा दर 7.39 टक्के वाढल्याने ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्र राज्यात तिसरी ठरली आहे. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

Read More

नवीन कुर्ली वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून द्या

ना.महाजन यांची ना.रवींद्र चव्हाण व आम. नितेश राणे यांनी घेतली भेट ⚡कणकवली ता.२८-: कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भाजपाचे नेते आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात…

Read More

आंबोली गावठणवाडीत घरावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याकडून हल्ला…

घटनेने खळबळ:पोलिसांत तक्रार दाखल ⚡आंबोली,ता.२८-: येथील गावठणवाडीत गुरूवारी रात्री (ता.२८) साडे बारा नंतर अज्ञात टोळक्याकडून दहशद माजवत घरांवर दगडफेक केली.आपले नुकसान करण्यात आले.याबाबतची तक्रार आंबोली पोलीस स्थानकात अर्जुन न्हानू राऊत यांनी दिली आहे.व पोलिसांनी शोध घेऊन कारवाईची मागणी केली आहे. आंबोली परिसरात दहशद माजवणाऱ्या अज्ञात टोळक्यांचा शोध घेत त्यांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा. आंबोली मुख्य…

Read More

आपत्ती निर्माण होणाऱ्या गावांत २० युवकांचे पथक आवश्यक…

गजानन नाईक:पत्रकार संघ व अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून “त्या” युवकांचा सत्कार.. सावंतवाडी,ता.२७: आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत असलेल्यांना तात्काळ सहकार्य करणे सोईचे व्हावे यासाठी आपत्ती निर्माण होणार्‍या गावात किमान वीस युवकांचे पथक तयार करुन त्यांना शासनाकडुन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाकडे करणार आहोत, असे मत अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन…

Read More
You cannot copy content of this page